मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावातील भिल्ल वस्तीतील घराला लागलेल्या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना आज दुपारी 3.30 घडली आहे. परंतु आग कशाने लागली हे अद्याप समजू शकले नाही.
लालू अनंता गावडे (34), दादू लालू गावडे (वय 2) आणि प्रांजल अरुण पवार (वय 2) अशी मृत झालेल्याची नावे आहेत.
Advertisements

याबाबत मिळालेली माहिती अशी, शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावातील भिल्ल वस्तीमध्ये गावडे कुटुंब 15 वर्षांपासून राहत आहे. त्यांचं घरावर उसाचे पाचट टाकले होते. घरी पत्नी स्वयंपाक करत असताना ही आग लागली, यात बापलेक आणि एक मुलगी हीच होरपळून मृत्यू झाला आहे. यातील एका मयत याचन्ह असे पोलिसांनी सांगतिले आहे.
