अनिल खंडागळे-रोहा प्रतिनिधी
रोहा:-मागील कित्येक वर्षापासून रखडलेला आंबेवाडी ते कालवा पाणीप्रश्न अखेरच्या टप्प्यात आला आहे.अस असताना स्थानिक ठेकेदारांनी लालसेपोटी कामात आणलेला अडथळा लक्षात घेता आक्रमक झालेल्या कालवा समन्वय समितीने अधिकृत ठेकेदाराला सरक्षण देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले.परुंतु अद्यापहि थांबलेल्या कामाला गती मिळालेली नाहि.अाज जवळजवळ ७०% काम पुर्ण झालेल आहे.परंतु कालव्याला पाणी येण्याच्या प्रतिक्षेत असणार्या ग्रामस्थांच्या पाठी लागलेला संघर्षाचा काळ काहि थांबण्यच नाव घेत नाहि.
आज रायगड पाटबंधारे विभाग-कोलाड येथील कार्यकारी अभियंत्यांची भेट कालवा समन्वय समितीच्यावतीने घेण्यात अाली.यावेळी जर स्थानिक ठेकेदाराच्या आडमुठी धोरणामुळे जर हे काम २५ तारखेपर्यत प्रगतीपथावर आल नाहि तर “१ मे महाराष्ट्र दिनी” आमरण उपोषणाचा बडगा कालवा समन्वय समिती उभारणार असुन त्यानंतर होणार्या परिणमांस आपण जबाबदार असल अस सांगितल.यावेळी नवनिर्वाचीत कार्यकारी अभियंते पवार यांनी लवकरच तिसे तेथील रखडलेल कामाची प्रत्यक्ष पहाणी करुन ते कम मी स्वत:लक्ष देवून प्रगतीपथावर आणतो अस आश्वासन ग्रामस्थांना दिल.अशाच स्वरुपाच निवेदन रोहा तहसिल कार्यालयातहि देण्यात आल.यावेळी उपस्थित कालवा समन्वय समितीचे राजेंद्र जाधव,प्रशांत राऊत,दिपक भगत,सचिन साळुंखे,योगेश राऊत,सुनिल बामुगडे,सागर भगत,निखिल मोंढे,रुपेश साळवी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.