Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर : जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी सहजसेवा ट्रस्ट ही सेवाभावी संस्थेतर्फे गेली २२ वर्षे सातत्याने जोतिबा डोंगरावरील गायमुख परिसरामध्ये मोफत अन्नछत्र सेवा देते. यावर्षी देखील २ ते ६ एप्रिल या कालावधीमध्ये दिवस -रात्र सुरू राहणार आहे. मागील वर्षी झालेली गर्दी लक्षात घेवून यावर्षी दोन लाखांवर यात्रेकरू या अन्नछत्रास भेट देतील, या अंदाजाने अन्नछत्राची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. अशी माहिती सन्मती मिरजे, चिंतन शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली. वाहनाने येणारे यात्रेकरू मुख्य रस्त्याने गायमुखावर येतात. त्यांच्या वाहनांसाठी गायमुख परिसरामध्ये वाहनतळ तयार करण्यात आला आहे. येथे लाईटची व्यवस्थाही करण्यात आली आहे. विविध ठिकाणांहून येणारे यात्रेकरू रात्री अपरात्री डोंगरावर पोहोचत असतात. त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, या हेतूने त्यांच्या सोयीकरिता ‘सहजसेवा’च्या वतीने २४ तास अन्नछत्र सुरू ठेवण्यात येणार आहे. अन्नछत्रामध्ये यात्रेकरूंना जेवणासाठी १५ हजार चौरस फुटाचा मंडप उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर चहा व मठ्ठ्याकरिता वेगळे मंडप उभारण्यात आले आहेत.
मिरजे यानी दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या विविध भागातुन आणि परराज्यामधून चैत्र यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लाखोंच्या घरात आहे . बैलगाड्या,विविध वाहने ,आणि चालत येणारे भाविक कधीही आले तरी त्याना मोफत पोटभर सुग्रास अन्न उपलब्ध व्हावे या उद्देशाने चोवीस तास दिवसरात्र हे अन्नछत्र सुरु राहणार आहे. त्यामुळे रात्री अपरात्री डोंगरावर येणाऱ्या भाविकांची ग़ैरसोय होऊ नये या उद्देशाने कुशिरे ते गायमुखमार्गे जोतिबा डोंगरावर येणाऱ्या पारंपरिक मार्गावर या अन्नछत्राची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी पंधरा हजार चौरस फुटाचा भव्य मंडप उभारण्यात आला असून तिथे भाविकाना सुग्रास भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. जेवणाबरोबरच चहा आणि मठ्ठा यासाठी स्वतंत्र मंडप उभारला जात आहे. जेवण तयार करण्यासाठी वीस मुख्य आचारी,आणि त्यांचे मदतनीस, भाज्या चिरण्यासाठी तीस महिला, पन्नास वाढपी, ताट वाटी स्वच्छ करण्यासाठी सत्तर महिला,इतर कामासाठी पन्नास मजूर ,तसेच ट्रस्टचे विश्वस्त ,हितचिंतक ,स्वयंसेवक असे चारशे लोक अहोरात्र सज्ज राहणार आहेत. या जेवणासाठी पंधरा हजार किलो बासमती तांदूळ,तीन हजार किलो तूर डाळ, सहा हजार किलो रवा, दहा हजार किलो साखर, साड़े चारशे डबे रिफाइंड तेल, सात हजार लीटर दूध , तीनशे किलो चहा पावडर, तीनशे किलो मूग, तीनशे किलो काळा घेवड़ा, तीन हजार किलो बटाटा , चार हजार किलो कांदा , दोनशे किलो लसुण, एक ट्रक भाजीपाला , चार टन लाकूड़ , दोनशे गैस सिलेंडर्स चटणी व इतर मसाले नीट वाट करुन तयार ठेवले आहे या अन्न छत्राच्या माध्यमातून पोलीस दल, गृहरक्षक दल, आरोग्य विभागाचे अधिकारी – कर्मचारी, वनविभाग , बांधकाम विभाग,ग्रामपंचायत कर्मचारी, परिवहन विभाग, तसेच व्हाइट आर्मी ,टू व्हीलर -फोर व्हीलर मेकैनिक असोसिएशन यासारख्या सेवाभावी संस्था आणि त्यांच्या स्वयंसेवकाना जेवण पोहोच केले जाते
दरम्यान या तीन दिवसात रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवावा तसेच ‘यात्रेकरूंनी सहज सेवा ट्रस्टच्या या अन्नछत्राचा लाभ घ्यावा. तसेच दानशूर व्यक्तींनी, संस्थांनी या उपक्रमास मदत करावी, असे आवाहन करण्यात या पत्रकार परिषदेत केले.