Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर दि.२७ भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे विकास कामाचे ध्यासच घेतला आहे, बास्केट ब्रिजचे काम असो, कोल्हापूर विमानतळाचे आधुनिक करण बरोबरच विस्तारीकरण असो, वा रेल्वे नुतनीकरण असो, काही दिवसापूर्वीच कोल्हापूर ते मुंबई रोज विमान उडान सुरू केली, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बास्केट ब्रिज कामाचे उद्घाटन, त्याचबरोबर कोल्हापूर रेल्वेच्या कामासाठी 43 कोटी मंजूर, कोल्हापूरचे विमानतळ आधुनिकरण नूतन इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्याची घोषित करीत अनेक प्रलंबित व नवीन कोल्हापूर जिल्हाचे विकास कामाचा एका पाठोपाठ एक धडाकाच सुरु केला आहे.
खासदार धनंजय महाडिक यांच्या कामांना यश- कोरोना कालावधी पासून म्हणजे गेल्या तीन वर्षापासून बंद असणारी सह्याद्री एक्सप्रेस आता पुन्हा सुरू होणार आहे. पाच नोव्हेंबर पासून दररोज सह्याद्री एक्सप्रेस सुरू होईल. मात्र सध्या कोल्हापूर- पुणे – कोल्हापूर मार्गावर ही विशेष रेल्वे धावणार असून, लवकरच ती पूर्ववत मुंबईपर्यंत जाईल. सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरू व्हावी, यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
कोरोना काळात कोल्हापूर मुंबई मार्गावर धावणारी सह्याद्री एक्सप्रेस रेल्वे गाडी बंद झाली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने सह्याद्री एक्सप्रेस सुरू केलीच नाही. त्यामुळे खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने केंद्रीय रेल्वे मंत्रालय तसंच रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत पाठपुरावा केला.
त्यांच्या प्रयत्नांना आज यश आले. पाच नोव्हेंबर पासून पुन्हा सह्याद्री एक्सप्रेस सुरू होत आहे. मात्र सध्या तरी ही गाडी पुण्यापर्यंत धावणार आहे. ५ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत, कोल्हापूरातून रात्री ११.३० वाजता सुटणारी सह्याद्री एक्सप्रेस, दुसर्या दिवशी सकाळी ७.४५ वाजता पुण्यात पोचेल.
तर पुण्याहून रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी सुटणारी सह्याद्री एक्सप्रेस, दुसर्या दिवशी पहाटे पाच वाजून ४० मिनिटांनी कोल्हापुरात पोहोचेल. सध्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर प्लॅटफॉर्म बांधणीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर, सह्याद्री एक्सप्रेस पूर्ववत मुंबईपर्यंत धावेल, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
मात्र पाच नोव्हेंबर पासून सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूर- पुणे मार्गावर धावणार असल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.