Weather Updates : मुंबईत पावसाचे रौद्र रूप…!

MEDIACONTROL ONLINE 

मुंबई, रायगड, कोल्हापूरसह कोकणात पावसाने थैमान घातलं आहे. राज्यात पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्याला अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर, पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित आणि मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. एनडीआरएफ जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. तर मुंबईतही दोन दिवसांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचलं आहे. मुंबईतील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे. तर लोकल ट्रेनही अपेक्षित वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने सुरु

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *