कोल्हापूर : जगतापनगर येथे गुरुवारी मध्यरात्री दगडाने ठेचून झालेल्या तरुणाच्या खून प्रकरणी करवीर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे मुख्य संशितासह चारीही मारेकऱ्यांना अटक केली. पूर्व वैमनस्यातून ऋषिकेश महादेव सूर्यवंशी (वय २४, रा. शिंगणापूर) याचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार गणेश येलगट्टी, अथर्व हावळ, वृषभ साळोखे व सोहम शेळके अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. एलसीबी आणि करवीर पोलिसांनी रात्रभर तपास सुरू ठेवला होता. त्यात चारही मारेकरी पोलिसांच्या हाताला लागल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.
मुख्य संशयित गणेश येलगट्टी आणि ऋषिकेश यांच्यात पैशाची देव घेव यावरून वाद होऊन वैमनस्य निर्माण झाले होते. यांच्या मध्ये यापूर्वी वादावादी आणि हाणामारीच्या घटना घडल्या होत्या. मृत ऋषिकेश वर लक्ष्मीपुरी पोलिस स्टेशन मध्ये मारामारी चे दोन गून्हे नोंद होते. आर्थिक गोष्टींतून नेहमीच यांच्यात वाद होत होते. त्यामुळे मारेकरांनी ऋषिकेश काटा काढण्याचा ठरविले.
दारू पिण्याच्या आमिषाने ऋषिकेशला जगतापनगर येथील मैदानावर बोलवले. ऋषिकेशला जास्त नशा झाल्यावर त्याच्यावर एकाचवेळी सर्वांनी हल्ला केला. चाकूने व इतर शस्त्राने त्याच्यावर वार करण्यात आले.मारेकरी वृषभ याने रक्ताच्या थारोळ्यात तडफडणाऱ्या ऋषिकेशचे डोके भल्या मोठ्या दगडाने आठ वेळा ठेचल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले आहे.
आरोपी 👇👇