Getting your Trinity Audio player ready...
|
Read Time:1 Minute, 13 Second
कोल्हापूर : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेले लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका दि. ३१ जानेवारी २०२३ पर्यंत मागविण्यात आल्या होत्या.
या प्रवेशिका पाठविण्यास ८ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर येथे संपर्क साधावा.