काय म्हणताय..?रोहामध्ये १ मे महाराष्ट्र दिनी चक्क आमरण उपोषण….!

दिपक भगत-रोहा तालुका

रोहा :- गेली कित्येक वर्षे आंबेवाडी ते निवी परिसरातील गावे कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहिलेली आहेत.पाण्यामुळे या विभागात उद्भवलेल्या दाहकतेची दखल घेत कालवा समन्वय समितीने संघर्षाचा पताका हातात घेतला.परंतु कित्येक महिणे आंबेवाडी ते निवी या कालव्याला पाण्यासाठी चाललेला संघर्ष काही थांबण्याच नाव घेत नाहि.कालव्याला पाणी याव सर्व शेतकरी पुन्हा एकदा सुजलाम-सुफलाम् व्हावेत.अशी आग्रहि मागणी करूनही ग्रामस्थांच्या आणि कालवा समन्वय समितीच्या मागणीला धिम्यागतीने सहकार्य करण्याची भुमिका पाटबंधारे विभाग रोहा यांच्याकडुन वेळोवेळि घेण्यात आली .कालवा समन्वय समितीने अनेकदा अधिकार्यांच्या भेटि घेतल्या,चर्चा केली मात्र संघर्षाचा कठिण काळाला सामोर जाव लागत आहे याचीच खंत पंचोक्रोशीतील ग्रामस्थांना चिंतेत टाकत आहे.

        आजतागायत ७०% च्या आसपास कालवा दुरूस्तीच काम पूर्ण झालेल आहे.हि जरी आनंदाची बाब असली तरि हे काम एवढ्या धिम्यागतीने का होत आहे? कोणी काम थांबवुन काम करणार्या ठेकेदाराला भेटायला बोलावतोय.तर कुणी हे काम होवुच नये यासाठी प्रयत्न करतोय.कोणी कितीही रान उठवलं तरी कालवा समन्वय समिती आपल्या भुमिकेवर ठाम असल्याच चित्र सध्या रोहा तालुक्यात पहावयास मिळत आहे.आंबेवाडी ते निवी कालव्याच गेलेल गतवैभव पुन्हा आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणार्या कालचा समन्वय समितीने अखेर आमरण उपोषणाचा बडगा उभारलेला आहे.कालव्याला पाणी येईल या प्रतिक्षेत असलेल्या ग्रामस्थांच एक वर्षे उलटुन गेल परंतु अदयाप पाणी न सोडल्यामुळे तसेच प्रशासनाच्या गलथान नियोजनामुळे आपल्या प्रमुख मागण्यांसह कालवा समन्वय समितीचे पदाधिकारी १ मे महाराष्ट्र दिनी आमरण उपोषणास बसणार आहेत.अस प्रतिपादन कालवा समन्वय समितिच्यावतीने करण्यात आल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *