Getting your Trinity Audio player ready...
|
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क
कोल्हापूर (प्रतिनिधी:- जावेद देवडी)
सी बी एस स्टँड समोर महालक्ष्मी चेंबर्स आहे.
या ठिकाणी बेसमेंटला अनेक दुकान गाळया मध्ये मोबाईल शॉपी आहेत या मोबाईल शॉपी मध्ये मोबाईल मोबाईलला लागणारे साहित्य विक्री केली जाते,
बदलत्या काळानुसार तरुण वर्ग बहुतांश मोबाईल विक्री व्यवसाय कडे वळले व्यवसाय करता करता शॉट कट मार्गाने श्रीमंत व्हावे उद्देश ठेवून अनेक नामांकित मोबाईल बरोबरच बनावट कंपन्यांचे मोबाईल मोबाईलचे साहित्य बॅटरी हेडफोन मेमरी कार्ड कार्ड रीडर अशा अनेक वस्तु या ठिकाणी विक्रीस आहेत सर्व सामान्य मध्यमवर्गी लोकांना गरजू वस्तु एकाच ठिकाणी मिळत असल्याने या ठिकाणी वर्दळ सुरू असते या गरजेचा गैर फायदा घेत अनेक व्यवसायिक नामांकित कंपन्यांचे वस्तू विकता विकता बनावट कंपनीचे दोन नंबर वस्तू विकण्यास माहेर व पटाईत आहेत एखांदा ग्राहक आला की त्याला वस्तू पटवून विकतात पण ते दोन नंबरचे बनावट चायना असल्याने जास्त काळ टिकत नाही लवकरच मोडतोड नादुरुस्त होते व आपली फसवणूक झाल्याची निदर्शना येते .
असे असले तरी नवीन नवीन रोजच ग्राहकांची चेंबर मध्ये गर्दी असते सरळ सरळ दिवसा सर्वा समोर फसवणूक होत आहे माहित असून देखील लोक तिथं खरेदीस येतात आता ह्या व्यवहारावर वचक ठेवणार कोण असा प्रश्न होतो.
कोल्हापूर महानगरपालिका परवाना विभागामार्फत विविध व्यवसायांना परवाना घेणे बंधनकारक असताना, या ठीकाणी काही व्यवसायिक महानगरपालिकेचा लाखो रुपयाचा महसूल बुडवून विनापरवाना विविध व्यवसाय करत असल्याचे प्रसार माध्यमाच्या निदर्शनास आल्यानंतर, प्रसार माध्यमांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून परवाना विभागास निदर्शनास आणल्यानंतर परवाना विभागाने आज महालक्ष्मी चेंबर्स मधील बेसमेंट मध्ये सुरू असलेले विविध मोबाईल्स शॉपी यांच्यावर कारवाई करत तब्बल 12 दुकानांना सील केले आहे. या महालक्ष्मी चेंबर्स मधील वरील मजल्यावर अजून पर्यंत परवाना विभाग कारवाईसाठी गेला नाही.
मात्र येणाऱ्या काळात या चेंबर्स मधील गेले कित्येक वर्षे सुरू असलेले विनापरवाना हॉटेल लॉजिंग आणि यात्री निवास लवकरच सील केले जातील असे सांगण्यात येत आहे. जर एका महालक्ष्मी चेंबर्स मध्ये बेसमेंट मध्येच 12 व्यावसायिक विनापरवाना व्यवसाय करत असल्याचे एका दिवसाच्या कारवाईत समोर येत असेल तर, परवाना विभागाने मनावर घेतल्यास एका महिन्यात महानगरपालिकेच्या तिजोरीत लाखो रुपयांची भर पडल्याशिवाय राहणार नाही. अशी चर्चा सर्वसामान्यातून होत आहे. नूतन अतिरिक्त आयुक्त पाटील यांनी जर परवाना विभागाला आणि त्यांच्या कारभाराला वळण लावले, तर सामान्य लोकांची फसवणूक थांबेल
या कारवाई मुळे सर्व स्तरातून प्रसार माध्यमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.