मुंबईतील अतिवृष्टीचा रेड अलर्ट : मंत्रालयासह सरकारी कार्यालयांना अर्धा दिवस सुट्टी;
खासगी कार्यालयांना 'वर्क फ्रॉम होम'चा सुचना

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, ८० ते ९० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार मंत्रालय व बृहन्मुंबईतील सर्व शासकीय कार्यालयांमधील अत्यावश्यक सेवा वगळता इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी अर्धा दिवसानंतर कार्यालय सोडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच सर्व खासगी कार्यालयांनी ‘वर्क फ्रॉम होम’ (Work From Home) पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *