आजपासून राज्यात पोलीस भरतीला सुरुवात….

मुंबई :  पोलीस दलातील १७ हजार पदांची भरती प्रक्रिया आज १९ जूनपासून सुरु झाली आहे. याबाबतची माहिती अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी दिली आहे. १७ हजार पदांसाठी १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज करण्यात आले आहेत. आजपासून राज्यात वेगवान ठिकाणी पोलीस भरतीला सुरुवात झाली असून परीक्षार्थी विद्यार्थी चाचणीसाठी पोहोचले आहेत. राज्यामध्ये काही ठिकाणी पाऊस सुरू आहे आणि अशा स्थितीत भरती प्रक्रिया राबवणे योग्य नसल्याचे मत काही जणांकडून व्यक्त केले जात आहे. मुंबईमध्ये पाऊस पडत असल्याने भरती प्रक्रियाचे वेळापत्रक अजूनही जाहीर करण्यात आले नाही तरीसुद्धा घाटकोपरच्या रेल्वे पोलीस मैदानात रेल्वेतील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आज सुरू करण्यात आली आहे दुसरीकडे नाशिक छत्रपती संभाजी नगर अमरावती या जिल्ह्यांमध्ये सुद्धा भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.पोलीस भरतीच्या चाचणीचे टेन्शन एकीकडे आहे तर दुसरीकडे पावसाच्या धारा सुद्धा आहेत आणि यामुळे आलेल्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ शकते अशी चिंता व्यक्त केली जात असली तरी सुद्धा अमरावतीमध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *