कोल्हापूर : कागल तालुक्यातील करनुर गावातील गुलाब बाबालाल शेख वय ६५ यांच्यावर पाच ते सहा तरुणांनी कोयत्याने हल्ला करुन गंभीर जखमी केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चार आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून अटक करण्यात आली आहे.
अधिक मिळालेली माहिती अशी की दिनांक 8 जुलै रोजी करनुर गावात गुलाब बाबालाल शेख घरी जात असताना शेख मळ्याजवळ दोन मोटर सायकल वरुन आलेल्या पाच ते सहा अज्ञात तरुणांनी त्याचे डोक्यात कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी गुलाब शेख यांच्या मुलाने कागल पोलीस स्टेशन मध्ये घडलेल्या प्रकराबाबत फिर्याद देऊन त्यांच्या गुन्हा दाखल केला होता.
गुलाब शेख यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार चालु असताना दिनांक 11 जुलै रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.
सदरची घटना ही गंभीर स्वरुपाची असल्याने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना सदर गुन्हयाचा पूर्ण तपास करण्याची सूचना दिली त्यानुसार हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे दोन स्वतंत्र तपास पथक तयार केलीत.तपास पथकाने घटनेच्या स्थळी जाऊन पंचनामा केला. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की मोटरसायकल वरून आलेल्या पाच ते सहा जणांनी
गुलाब शेख यांच्यावर हल्ला केला होता. गोपणीय माहितीव्दारे हा गुन्हा हा आद्या, सोम्या, पत्या व त्यांचे इतर तीन साथीदार यांनी केला असल्याची प्राथमिक माहिती पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने इचलकरंजी परिसरात जाऊन चार आरोपींना ताब्यात घेतले.त्यामध्ये प्रर्णोत शिवाजी धनवडे रा. कबनूर २) आकाश नरेश कांबळे रा. चंदुर ३) सौरभ दिनकर जाधव रा. चंदुर ४) सम्मेद विजय ऐनापुरे रा. चंदुर. यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या साथीदारांची नावे सांगीतली त्यामध्ये आदित्य प्रकाश कांबळे रा. चंदुर सुशांत जरळी रा. हलकर्णी.
आरोपींनी दिलेली माहिती अशी की घोडा गाडी शर्यतीसाठी घोडा विकत घेण्यासाठी ते गेले होते परत येताना शेख मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुलाब शेख यांची मोटर सायकल आरोपींना घासली त्यामुळे किरकोळ वादावादी झाली होती. त्या कारणातुनच संगनमत करुन गुलाब शेख यांच्यावर कोयत्याने हल्ला करून घटनास्थळावरुन पळुन गेले. चार आरोपींना कागल पोलिसांच्या ताब्यात दिले असून 2 आरोपींचा शोध सुरू आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक, सागर वाघ तसेच पोलीस अमंलदार सुरेश पाटील राम कोळी, विनायक चौगले, प्रविण पाटील, विनोद कांबळे, कृष्णात पिंगळे, संजय हुंबे, निवृती माळी, अशोक पवार यांनी केली आहे.