जिल्हा प्रतिनिधी:- कुणाल दि. काटे
बलात्कार !! बलात्कार !! बलात्कार!!
हा शब्द कानावर पडताच डोळ्यांसमोर एक भयावह चित्र निर्माण होतो…
न उमललेल्या कळीवर अत्याचार करणे हा कोणता पुरुषार्थ !?? एक नव्हे तर अनेक घटना एकापाठोपाठ कानावर येतच आहेत… पहिले घटना ही कोलकत्ता मध्ये दूसरी बदलापूर मध्ये आणि आत्ता कोल्हापूर मध्ये, अशी घटना समोर येताच राघव सरदेसाई यांनी असे म्हणाले की यात शामिल असणाऱ्या एकेक दोषींना फाशी ची शिक्षा तर झालीच पाहिजे शिवाय अशा नराधमांपासून वाचण्यासाठी माझ्या प्रत्येक ताईने शस्त्रविद्या शिकून सशक्त बनून एका रणरागिणी प्रमाणे जगायला शिकाव..!!
तूच हो दुर्गा तूच हो काली
मानवी समाजामध्ये मुलगी स्त्री ही नेहमीच शोषक अब्ला समजली जाते
स्त्री जातीचा उद्धार करणे हे आपले कर्तव्य समजले जात होते पण खरंच असं होतय का??
आजची परिस्थिती बघून तर अस वाटतं की तिचा अपमान करण्यात कोणतीच कसर शिल्लक नाही
जर स्त्री शोषक आणि अब्ला असती तर झाशीची राणी सावित्रीबाई फुले जिजाऊ ह्या कोण होत्या मग??
भर सभेत द्रोपती चा अपमान झाला म्हणून महाभारत घडलं
कुठे गेलेत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार परस्त्री माता बहिणी प्रमाणे आहे का फक्त शिवजयंती दिवशी आठवतात ते ??
शिक्षणामुळे लोक फकत सुशिक्षित झालीत पण विचार मात्र आजुन खालच्या दर्जाचेच आहेत ती स्वतंत्र तर नावालाच झाली पण आजूनही तिच्या आयष्यातले निर्णय ती घेते का??
प्रत्येक स्त्रीच रक्षण करणं हे समज्याच कर्तव्य आहे पण हे कोण आचरणामध्ये आणातच नाही तिला फक्त खाली खेचलं जातं हे करण्यात मात्र आपला समाज पुढे आहे
काळाच्या गरजेनुसार बंधनं मुलींवर नाही तर मुलांवर सुद्धा घाला
विचारा तुमच्या मुलांना कुठे जातोस कुणासोबत फिरतोय रात्रीचा बाहेर राहू.
सांगा त्याला कोणत्याही मुलींकडे वाईट नजरेने बघू नको बाहेर फिरणारी प्रत्येक मुलगी ही आई बहिणी प्रमाणे जप ज्यादिवशी प्रत्येक घरात हे शिकवलं जाईल तेव्हा कोणत्याच मुलीला बाहेर पडताना अडवल जाणार नाही
कोणतीच मुलगी पंख पसरायला घाबरणार नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कोल्हापूर शहर सचिव राघव राजेंद्र सरदेसाई यांनी आपले मत व्यक्त केले.