सांगली जिल्ह्यात सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व पुतळा व्हावा : डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 59 Second

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे परिवर्तन चळवळीतील एक नायक असून त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगांव येथे झाला आहे त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी सांगली शहरांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक झाले पाहिजे म्हणून अनेक वर्षापासून सांगली जिल्ह्यातील मातंग समाज व वेगवेगळ्या पक्ष संघटनांच्या वतीने लेखी व तोंडी निवेदन देऊन सुद्धा आज तागायत शासन व प्रशासन यंत्रणा याबाबत दाद देत नाहीत, या शासन व प्रशासन यंत्रणेच्या उदासिनतेचा डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.

प्राध्यापक सुकुमार कांबळे म्हणाले, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे हे परिवर्तन चळवळीतील एक नायक असल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शताब्दी वर्षानिमित्त अण्णाभाऊंचे स्मारके व पुतळे उभे होत आहेत. असे असताना अनेक वर्षापासून मागणी करून सुद्धा अण्णाभाऊंच्या जिल्ह्यातच सांगली शहराच्या ठिकाणी अण्णाभाऊंचे सुसज्ज असे स्मारक व त्यांचा पुर्णा कृती पुतळा होत नाही, याचे आश्चर्य वाटते तसेच जिल्ह्यातील मातंग समाजाच्या पक्ष संघटनांनी पुष्पराज चौकामध्ये जो अण्णाभाऊंचा पुतळा बसवला आहे. त्या बसवणार्‍या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्याऐवजी, त्यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल करून अण्णाभाऊ प्रेमींचा आवाज दाबण्याचे काम शासनाने केले आहे.

तेव्हा आम्ही डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अशा मागण्या करतो, कि

१) एक ऑगस्ट २०२० च्या आत पुष्पराज चौकातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची जागा कायम करून सुसज्ज असा अण्णाभाऊंचा पुतळा शासनाच्यावतीने उभा करण्यात यावा.

२) अतिक्रमण करून पुष्पराज चौकांमध्ये मातंग समाजाच्या वेगवेगळ्या संघटनांनी पुतळा उभा केला आहे, यासंदर्भात कार्यकर्त्यांच्या वर जे गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावे.

३) सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी आयुक्त बंगल्याशेजारी मल्टिप्लेक्स टॉकीज समोर व सर्किट हाऊस मागील शासकीय जागा देऊन त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभा करण्यासंदर्भातील निर्णय एक ऑगस्ट २०२० पर्यंत घोषित करण्यात यावा.

अन्यथा वरील मागण्यांची पूर्तता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील, असे डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने व प्राध्यापक सुकुमार कांबळे यांचे वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सांगण्यात आले.

 

 

 

 

 

 

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *