Getting your Trinity Audio player ready...
|
MEDIA CONTROL ONLINE :
मुंबई- भारतातील पहिल्या लिस्टेड फिनटेक कंपनी, इन्फीबीम ऍव्हेन्यु लिमिटेड ने आज सीसी ऍव्हेन्यु मोबाईल अॅपचे औपचारिक अनावरण केले – हे प्रगत टॅप पे सोल्यूशन जगातील सर्वात अॅडव्हान्स ओम्नी-चॅनल पेमेंट प्लॅटफॉर्म आहे. सीसी ऍव्हेन्यु टॅप पे भारतात पीओएससाठी २७ अब्ज रूपयांसह मार्केटमध्ये प्रवेश करण्याचा दिशने वाटचाल करत आहे.
नॅशनल पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया (एनपीसीआय – रू पे ची मूळ संस्था), व्हिसा आणि मास्टरकार्डचे वरिष्ठ अधिकारी तसेच आर्थिक विश्लेषक, बँका आणि उद्योग तज्ञ गुरुवारी झालेल्या या सीसी ऍव्हेन्यु टॅप पे लाँचसाठी उपस्थित होते. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
संदीप घोष, ग्रुप कंट्री मॅनेजर, इंडिया व साऊथ एशिया व्हिसा म्हणाले, एडिक्युट मेथड आणि टचपॉइंट्स सोबत डिजिटल पेमेंटच्या वापरात वाढ करणे आता शक्य आहे. सीसी एव्हेन्यूचे सॉफ्ट पीओएस सोल्यूशन हे त्या दिशेने एक पाऊल आहे आणि या लॉन्चबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. मला खात्री आहे की हे सोल्युशन देशभरातील व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचेल, त्यामुळे टॅप करून पेमेंट करने ग्राहकांसाठी सोयीस्कर होईल.
प्रवीणा राय, सीओओ, नॅशनल पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया (एनपीसीआय) याबद्दल बोलताना म्हणाल्या, डीप डिजिटल पेमेंटला व्यापार्यांनी स्वीकृती देणे ही आज भारतासाठी एक महत्त्वाची आवश्यकता आहे. ही पद्धत्ती सक्षम करणाऱ्या फिनटेक लँडस्केपमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा उदय होताना पाहुन आम्हाला खूप आनंद होत आहे. या नवकल्पनेमुळे पेमेंट्सच्या नवीन युगाची सुरुवात होईल आणि पेमेंटवेळी बरेचदा येणाऱ्या समस्यांचे निराकरण होईल.
टॅप पे या वैशिष्ट्यासह सीसी ऍव्हेन्यु मोबाइल अॅप आता भारतीय बाजारपेठेसाठी गेम-चेंजर ठरेल कारण ते कोणत्याही एनएफसी-अँड्रॉइड फोन ला स्मार्ट पीओएस टर्मिनलमध्ये रूपांतरित करेल. यामुळे देशातील कोणताही लहान व्यवसायी किंवा उद्योजक डिजिटल पेमेंट सहज, जलद आणि सुरक्षितपणे स्वीकारू शकेल.
इन्फीबीम ऍव्हेन्यु हे वाजवी दरात उपलब्ध असलेले पेमेंट एक्सेप्टनन्स सोल्यूशन आहे जे अत्यंत काळजीपूर्वक विकसित केले गेले आहे, हे भारतीय ई-कॉमर्सला समर्थन देते. या उपक्रमाचा उद्देश देशभरातील लक्षावधी एमएसएमईएस (MSMEs) मध्ये डिजिटल पेमेंटचा अवलंब करण्यास गती देणे आहे. हे नाविन्यपूर्ण समाधान लहान व्यवसायांमधील पेमेंट प्राप्त करण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती घडवून आणेल आणि ते सुरक्षितपणे संपर्करहित डिजिटल पेमेंट स्वीकारत असल्याने रोखीने व्यवहार करण्याची वृत्ती कमी होईल.
विश्वास पटेल, कार्यकारी संचालक,इन्फीबीम ऍव्हेन्यु लीमिटेड म्हणाले: “इन्फीबीम ऍव्हेन्यु आता सीसी ऍव्हेन्यु टॅप पे साठी उत्सुक आहे. देशाच्या दुर्गम भागातील व सूक्ष्म-उद्योजक आणि लहान व्यवसायांसमोरील पैसे व कनेक्टिव्हिटीसारख्या आव्हानांवर मात करण्यासाठी हे भारतातील पहिले पिन-ऑन-ग्लास सोल्युशन आहे, आमचे नेक्स्ट-जेन तंत्रज्ञान व्यवहाराची एक सहज सोपी पद्धत्ती ऑफर करते ज्याद्वारे ग्राहक व्यापार्यांना एनएफसीयुक्त स्मार्टफोनवर क्रेडिट किंवा डेबिट कार्ड टॅप करून पैसे देऊ शकतात. इव्हेंटद्वारे जगातील सर्वात प्रगत ओम्नी-चॅनल अॅप लाँच केल्याचा आम्हाला अभिमान आहे. सीसी ऍव्हेन्यु मोबाइल अॅप व्यवसायीकांना पेमेंट लिंक्स,क्यूआर कोड, स्मार्ट पीओएस, वेबसाइट, आयव्हीआरएस ची सुवीधा तर देतेच सोबतच व्यापाऱ्यांच्या स्वतःच्या अॅपद्वारे देखील सुरक्षितपणे आणि सोयीस्करपणे पेमेंट स्वीकारण्याची परवानगी देते.
डेलॉइट २०२२ ग्लोबल टीएमटीच्या अलीकडील अहवालानुसार, २०२६ पर्यंत भारतात १ अब्ज स्मार्टफोन वापरकर्ते असतील, भारतनेट कार्यक्रमांतर्गत २०२५ पर्यंत सर्व गावे फायबराइज करण्याच्या सरकारच्या योजनेला गती मिळेल, ज्याद्वारे ग्रामीण बाजारपेठेतील इंटरनेट-सक्षम उपकरणांना देखील गती मिळेल.
या अहवालात असेही नमूद केले आहे की २०२१ मध्ये भारतात १.२ अब्ज मोबाइल ग्राहक आहेत, त्यापैकी सुमारे ७५० दशलक्ष स्मार्टफोन वापरकर्ते आहेत.
विशाल मेहता, व्यवस्थापकीय संचालक, इन्फीबीम ऍव्हेन्यु लिमीटेड म्हणाले, ५ जी स्पेक्ट्रम अॅक्शन्स, स्वस्त इंटरनेट दर, स्मार्टफोनची वाढती संख्या, ही स्मार्ट पीओएस तंत्रज्ञानासाठी एक परिपूर्ण व मोठी वाढ आहे.जी देशभरात कॅशलेस व्यवहारांमध्ये आणखी वाढ करेल,
सध्याचे हाय-स्पीड इंटरनेट ४ जी हे सीसी ऍव्हेन्यु मोबाइल अॅपच्या अॅडव्हान्स ओम्नी-चॅनेल पेमेंट प्लॅटफॉर्मसाठी योग्य व बूस्टर आहे. ५ जी स्पेक्ट्रम वाटपानंतर,सीसी ऍव्हेन्यु मार्केटमधील मोठा हिस्सा काबीज करण्यासाठी सज्ज होईल.
सीसी ऍव्हेन्यु टॅप पे मुळे उत्पन्नाचा प्रवाह वाढेल आणि इन्फाबीम ऍव्हेन्यु मध्ये मोठी वृद्धी होईल अशी अपेक्षा आहे. या क्रांतीकारी तंत्रज्ञानामुळे विद्यमान व्यापारी आणि ग्राहकांसाठी ऑन-बोर्डिंग प्रक्रिया सुरळीत आणि सहज होईल कारण यापुढे केवायसीची आवश्यकता भासणार नाही.