Getting your Trinity Audio player ready...
|
Read Time:1 Minute, 24 Second
कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१५ : मागील महापुराचा अनुभव लक्षात घेऊन यंदाच्या संभाव्य पूरपरिस्थितीसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने बारकाईने नियोजन केले आहे. पूर बाधित नागरिकांना आवश्यक सेवा-सुविधा देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज ..
पूर कालावधीत जिल्ह्यातील ग्रामीण भागात पुरेसा व स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा यासाठी जिल्हा परिषदेमार्फत आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे.
पुरामुळे स्थलांतरीत कॅम्पमध्ये राहणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत २६७ फिरती वैद्यकीय पथके यात १ हजार ३५ कर्मचारी आरोग्य विभागासाठी नेमली आहेत.
पूरामुळे बाधित होणाऱ्या जनावरांसाठी चारा छावण्यांची सोय करण्यात आली आहे. पुरपरिस्थितीत जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे..