कोल्हापूर : “नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये संशोधनाला विशेष असे महत्त्व दिले आहे त्यामुळे संशोधन विकास व चालना हा येत्या काळात अत्यंत महत्वाचा विकास घटक असणार आहे . त्यामुळे शिक्षकाने अध्यापनाबरोबर नेहमी नाविन्याचा ध्यास धरून सांशोधन करावे. ” असे मत आयआयटी खरगपूर येथील माजी अधिष्ठाता व प्रसिद्ध संशोधक प्रोफेसर डॉ. ब्रिज कुमार धिंडॉ यांनी व्यक्त केले. ते कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर येथे प्राध्यापकांसाठी आयोजित केलेल्या एकदिवसीय अभिमुखता मार्गदर्शन शिबिरासाठीचे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी ,उपाध्यक्ष साजिद हुदली,सचिव दीपक चौगुले उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना प्रोफेसर धिंडॉ यांनी संशोधनाचे महत्त्व विषद केले तसेच त्यांच्या कार्यकाळात त्यांना आलेले अनुभव त्यांनी सर्वांना सांगितले.तसेच नव संशोधकाना आपले देश विदेशातील संशोधनाचे अनुभव व संधी याची विस्तृत माहिती दिली .प्रोफेसर धिंडॉ यांनी भारतामध्ये संशोधन कार्य वाढविण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेतयावर भर दिला. प्राध्यापक आणि संशोधक या दोन भूमिका पार पाडत असताना दोन्ही चा समनव्य यशस्वी पणे कसा साधायचा यावरही त्यांनी भाष्य केले.
या कार्यक्रमात प्रास्तविक महाविद्यालयाचे सल्लागार डॉ. मोहन वनरोट्टी यांनी केले, कार्यकारी संचालक डॉ. विलास कार्जींन्नी यांनी मनोगत व्यक्त केले. सुनील कुलकर्णी यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात केआयटीचा संशोधनविषयक दृष्टिकोन स्पष्ट केला. डॉ.उदय भापकर मेकॅनिकल विभाग प्रमुख यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.प्रा. विनिता माने यांनी आभार मानले. प्रा. क्षितिजा ताशी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होता.