Media Control News Network
बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने सामन्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी (२५ डिसेंबर) ३ विकेट्सने रोमांचक विजय मिळवला. ज्यामुळे भारताने दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी जिंकली आहे. भारताच्या दुसऱ्या डावात झटपट विकेट्स पडत असताना आर अश्विन, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी उल्लेखीय फलंदाजी केली. विजयासाठी मिळालेले १४५ धावांचे लक्ष्य भारताने ४७ षटकात ७ विकेट्स गमावत पूर्ण केले