Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मधील लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच आणि नूतन सदस्यांचा सत्कार कार्यक्रम आज जिल्हा कॉंग्रेस कमिटी कार्यालयात पार पडला. यावेळी, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ.विश्वजीत कदम उपस्थित होते. तर आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार डॉ. कदम यांनी विकासाचे नेतृत्व म्हणून आमदार सतेज पाटील यांच्याकड पाहिल जाते ते काय करू शकतात हे महाराष्ट्राने पाहिले असून, त्यांच्या माध्यमातून निश्चितच ग्रामपंचायतींना निधी कमी पडला जाणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ग्रामपंचायत सरपंच ते आमदार असा राजकारणातील प्रवास अनेकांचा राहिला आहे. सरपंच हा स्थानिक राजकारणातील कणा असून सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी गावच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्राधान्य द्यावे, गावची मान अभिमानाने उंचावेल असे काम करा असे आवाहनही आमदार कदम यांनी केले.
आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे गांधीनगर नळ पाणी पुरवठा योजनेकरिता ३४३ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या योजनेमुळे दक्षिण विधानसभा मतदार संघातील १३ गावांची पाण्याची तहान भागणार असून या विकास कामाची नोंद इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी ठेवली जाईल. असे गौरवोद्गार आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी काढलेत.
आमदार सतेज पाटील यांनी, सरपंच म्हणून काम करताना गावच्या विकासाचं व्हिजन ठेवून काम करण्याच आवाहन केले दक्षिण मतदार संघातील १३ गावाकरिता गांधीनगर नळ पाणीपुरवठा योजनेकरता ३४३ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. पुढील तीस वर्षाची लोकसंख्या लक्षात घेऊन या योजनेला मंजुरी देण्यात आली असून या ३४३ कोटीच्या योजनेचे १००% श्रेय आपले आहे. कार्यकर्त्यांनी केलेल्या विकास कामांचे मार्केटिंग करा असे आवाहनही आमदार सतेज पाटील यांनी केले. याशिवाय दक्षिण मतदार संघातील १८ ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता असून आता येणाऱ्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या कामाला लागा गट-तट विसरून सर्वांनी एकजुटीने काम करावे सरपंचांनी ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन गावच्या विकासासाठी प्रामुख्याने प्रयत्न करण्याचे आवाहनही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी बोलताना केले.
आमदार ऋतुराज पाटील यांनी ग्रामपंचायतीना आता विविध योजना अंतर्गत थेट निधी मिळत असल्याने गावाच्या विकासासाठी काय गरजेचे आहे? ते पाहून निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी केले रस्ते गटर या व्यतिरिक्त नागरिकांचे आरोग्य, कचरा विघटन पाणीपुरवठा अशा कामांना प्राधान्य द्या. गावाचा कायापालट करण्याची ताकत सरपंचामध्ये असते. त्यामुळे गावगाडा चालवताना निधी वाया जाणार नाही याची काळजी सरपंचांनी घ्यावी. राजकारणाचे बाळकडू ग्रामपंचायत निवडणुकीतून मिळत असते. त्यामुळे सरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी मिळालेले संधीच सोने करून चांगले काम करा ग्रामपंचायतच्या विकासासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही देखील आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी सरपंचांनी आपली ग्रामपंचायत विकासाचे आदर्श मॉडेल बनवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे, मोरेवाडीचे सरपंच ए.डी कांबळे, सरनोबतवाडीच्या सरपंच शुभांगी आडसूळ, उचंगावचे सरपंच मधुकर चव्हाण, निगवे खालसा सरपंच ज्योती कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले. दक्षिण मतदार संघातील १५ गावाकरिता गांधीनगर नळ पाणीपुरवठा योजना करिता ३४३ कोटीचा निधी मंजूर झाल्याबद्दल तसेच दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामाकरिता निधी मंजूर झाल्याबद्दल लोकनियुक्त सरपंचांच्या वतीने आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दक्षिण मतदार संघातील 18 ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार आमदार विश्वजीत कदम, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या कार्यक्रमा वेळी, माजी महापौर निलोफर आजरेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस अँड.गुलाबराव घोरपडे, जिल्हा बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, गोकुळचे संचालक बाबासो चौगले, शशिकांत पाटील- चुयेकर, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, माजी नगरसेवक शशांक बावस्कर, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, करवीरच्या माजी सभापती मंगला पाटील यांच्यासह दक्षिण विधानसभा मतदार संघातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.