रायगड जिल्हा प्रतिनिधी दिपक भगत
रोहा-रायगड : महाराष्ट्र राज्यातील सरकारी-निमसरकारी,शिक्षक-शिक्षकेतर,महानगरपालिका,नगरपालिका,नगरपरिषद,नगरपंचायती कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी यांनी दिनांक १४/०२/२३ रोजी आपल्या विविध मागण्यांसाठि बेमुदत संपाचा बडगा उभारलेला आहे.कारण यापूर्वी प्रलंबित मागण्यासाठी मध्यवर्ती संघटना व ईतर घटक संघनेच्या मार्फत शासनाकडे चर्चा व निवेदन सादर करूनदेखील शासनाकडुन कोणतीही सकरात्मक प्रयत्न होत नसल्याची भावन कर्माचार्यांनी बोलून दाखवली.
यावेळी बोलताना गणेश लोंढे(रोहा तालुका अध्यक्ष-महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटाना)महाराष्ट्र शासनाने २००५ व त्यानंतर सेवेत रूजू झालेल्या सर्व कर्मचार्यांना जुनी पेन्शन बंद केली आहे.या सर्व कर्मचारीवर्गाला जुनी पेंशन योजना चालु करण्यासाठी विविध मोर्चे,आंदोलन शासनदरबारी काढून देखील शासनाने आजतागायत कोणीतच ठोस भुमिका घेतलेली नाहि.”कृषी सहाय्यक संवर्ग हा राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचा भाग असुन महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे बहुतांश सदस्य हे नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रूजू झालेले आहेत.यामुळे कोणत्याही परिस्थिती जुनी पेन्शन योजना चालु झालीच पाहिजे.”तसेच शासन दरबारी प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी आम्हि “राज्य सहकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने” पुकारलेल्या या संपात आम्हि सहभागी आहोत.
प्रलंबित मागण्या