जिल्ह्यातील १५ निवारागृहांमध्ये राज्यातील २२२ तर परराज्यातील ५९५ : जिल्हाधिकारी देसाई

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 52 Second

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी  :  जिल्ह्यातील १५ निवारागृहांमध्ये राज्यातील २२२ आणि परराज्यातील ५९५ अशा एकूण ८१७ जणांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात शेठ रुईया विद्यालय, मंगळवार पेठ येथे राज्यातील  २०, परराज्यातील ४ ,अशा २४ जणांचा समावेश असून याची क्षमता ५० जणांची आहे. रामकृष्ण हॉल लोणार वसाहत येथे राज्यातील २०, परराज्यातील ९ ,अशा २९ जणांचा समावेश असून याची क्षमता ५० जणांची आहे. मुलींची शाळा क्र. ६ लाईन बाजार येथे राज्यातील १ ,परराज्यातील ७ ,असे एकूण ८ असून याची क्षमता २५ जणांची आहे.
करवीर तालुका- सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी  येथे राज्यातील २, परराज्यातील ३५ ,एकूण ३७ जण असून क्षमता ७० जणांची आहे. डी. फार्मसी कॉलेज उजळावाडी – राज्यातील ९, परराज्यातील ३०, असे एकूण ३९ असून याची एकूण क्षमता ५० जणांची आहे. कागल- डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह कागल येथे राज्यातील ३ परराज्यातील ९७ , एकूण १०० जण असून  क्षमता ११३  जणांची आहे.  जयसिंगराव घाटगे विद्यालय येथे राज्यातील १४, परराज्यातील १०८, असे एकूण १२२ जण असून क्षमता १३० जणांची आहे.
हातकणंगले-घुगरे सर यांचे निवासी गुरुकुल वडगाव येथे परराज्यातील ७९ जण असून क्षमता १०० जणांची आहे. अशोकराव माने ग्रुप वाठार तर्फ वडगाव राज्यातील ३, परराज्यातील १०३ ,असे एकूण १०६ जण असून क्षमता ११५ जणांची आहे. शहरी बेघर निवारा केंद्र इचलकरंजी येथे राज्यातील ४५ , परराज्यातील ८ , एकूण ५३ जण असून क्षमता ५५ जणांची आहे.  राजीव गांधी भवन इचलकरंजी येथे राज्यातील ६४ जण असून त्याची क्षमता ७० जणांची आहे.
शिरोळ- शाळा क्रमांक १ जयसिंगपूर येथे राज्यातील १३, परराज्यातील १७, असे एकूण ३० क्षमता ५० आहे.
गडहिंग्लज- देवदासी छात्र वसतीगृह, संकेश्वर रोड, गडहिंग्लज येथे राज्यातील १०, परराज्यातील १ , एकूण ११ असून क्षमता २४ जणांची आहे,
गगनबावडा- माधव विद्यालय गगनबावडा येथे राज्यतील १३ जण असून क्षमता २० जणांची आहे. समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह गगनबावडा येथे राज्यातील ५ परराज्यातील ९७ असे एकूण १०२ असून क्षमता १०५ जणांची आहे.
यामध्ये कर्नाटकातील २१७ ,
तामिळनाडूमधील २१४,
राजस्थानमधील ८०,
मध्यप्रदेशमधील ४२,
उत्तर प्रदेशमधील २९,
केरळमधील ८,
पाँडेचरीमधील १,
पश्चिम बंगालमधील १
आंध्रप्रदेश  १
झारखंड १
बिहार १ अशा एकूण ११ राज्यातील ५९५ जणांचा तसेच महाराष्ट्रातील २२२ असे मिळून ८१७ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *