महायुती सरकारने शब्द पाळला, मराठा समाजाला न्याय दिला- खासदार धनंजय महाडिक

 

राज्यातील महायुती सरकारने सर्वसामान्यांचा विश्वास संपादन केला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात गाजत होता. अशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या पूर्ण करून, सरकारने समस्त मराठा समाजाला न्याय दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ट्रीपल इंजिन सरकारने, यापूर्वीच मराठा समाजासाठी विविध विकास योजना आणल्या आहेत. आता आरक्षणाबद्दल ऐतिहासिक निर्णय घेऊन, या सरकारने आपली विश्वासार्हता आणि जनसामान्यांबद्दलची आस्था सिद्ध केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *