Share Now
Read Time:5 Minute, 19 Second
१३३ व्या जयंतीनिमित्त महामानवाला कागलमध्ये अभिवादन
कागल प्रतिनिधी दि. १४:
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन्मानाने जगण्याचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क सबंध भारतीयांना दिला. देशासह संपूर्ण जगालाच त्यांनी समतेचा विचार दिला, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण
विशेष व सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कागलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त गैबी चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्यासह समरजीत घाटगे, ॲड विरेंद्र मंडलिक, श्रीमंत शहाजीराजे छत्रपती या प्रमुखांनी महामानवाला अभिवादन केले.

भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, “शिका व संघर्ष करा” या तत्त्वातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतिकूल परिस्थितीतही अत्यंत चिकाटीने आपले शिक्षण पूर्ण केले. ते लंडनला गेले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि बडोद्याचे छत्रपती सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना मदत केली. वकिलीची पदवी घेऊन परत मायदेशी आल्यानंतर कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांची जल्लोषी स्वागत केले.
समरजीत घाटगे म्हणाले, राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना विश्वास होता की बाबासाहेब आंबेडकरच या देशाला संविधान देऊ शकतात. भारतीय संविधानानुसार समाजामध्ये व्यवसाय, नोकरी, आणि शिक्षणाला प्रोत्साहन ही आता काळाची गरज बनली आहे.
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे मूळचे कागलचे. कागल ही विचाराची आणि समतेची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार कोणालाही तोडता येत नाहीत जो हे विचार तोडेल तो टिकत नाही. कारण समाज बदलण्याची ताकद या विचारांमध्ये आहे.
ॲड. वीरेंद्रसिंह मंडलिक म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून निवडणुका लढविण्याचा, अभिव्यक्तीचा आणि समानतेचा अधिकार दिलेला आहे.
श्रीमंत शहाजीराजे छत्रपती म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जवळचे ऋणानुबंध होते.
कागल ही समतेची भूमी….!
प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांची जन्मभूमी असलेले कागल ही समतेची भूमी आहे. स्वर्गीय कै. विक्रमसिंहराजे घाटगे यांनी गैबी चौकात भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा बसविला. त्यानंतर, अलीकडच्या काळात पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महात्मा जोतिराव फुले आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पूर्णाकृती पुतळे बसविले.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भय्या माने, प्रकाशराव गाडेकर, श्रीनाथ समूहाचे चंद्रकांत गवळी, राजेंद्र जाधव, नंदकुमार माळकर, बॉबी माने, ईगल प्रभावळकर, महेश घाटगे, प्रवीण काळबर, सतीश घाडगे, सौरभ पाटील, संजय चितारी, संग्राम लाड, नवाज मुश्रीफ, अजित कांबळे, विवेक लोटे, बच्चन कांबळे, नवल बोते, विवेक लोटे, बच्चन कांबळे, गणेश कांबळे, भगवान कांबळे, तुषार भास्कर, सुरज कामत, राहुल कांबळे, सुनील कांबळे, दिपक कांबळे, जयंतीकमिटी अध्यक्ष अक्षय घस्ते, उपाध्यक्ष प्रथमेश कांबळे, खजानिस मासूम कांबळे आदीप्रमुख उपस्थित होते.
Happy
0
0 %
Sad
0
0 %
Excited
0
0 %
Sleepy
0
0 %
Angry
0
0 %
Surprise
0
0 %
Share Now