Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूर मध्ये आपल्या भाषणाची सुरुवात ही तमाम कोल्हापूरकरांना माझा नमस्कार असे म्हणत मराठी मधून केली. “सुरवातीला बोलताना जय भवानी, जय शिवाजी ची घोषणा देऊन त्यांनी भाषणाची सुरुवात केली. “करवीर निवासीनी अंबाबाई देवीला वंदन केले.जगात भारी, कोल्हापुरी” असे वक्तव्य देखील त्यांनी केले.
कोल्हापूर हि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शाहुजी महाराज
यांच्या आदर्शाची धर्ती आहे.
यावेळी बोलताना त्यांनी विशेष उल्लेख केला की मी काशीचा खासदार आहे आणि आज करवीर काशी मध्ये आलो आहे.
यावेळी भाषणादरम्यान इंडिया आघाडीवर त्यांनी जोरदार टीका केली. “कॉंग्रेस आणि इंडिया आघाडीने देशविरोधात काम केले आहे. ही निवडणूक विकसित भारताची निवडणुक आहे. काश्मीर मध्ये ३७० पुन्हा आणणार असा कॉंग्रेसचा अजेंडा आहे असे त्यांनी बोलतांना सांगितले .इंडिया आघाडीवाले सरकारच्या दरवाजे पर्यंत पोहचू तरी शकतात का ? याचा त्यांनी विचार करावा,लोकसभा निवडणुकीच्या पुढच्या चारही टप्प्यात विरोधक चारीमुंड्या चित होणार. इंडिया आघाडीने सामाजिक न्यायाची हत्या करण्याचं ठरवलं आहे.पाच वर्ष पाच पंतप्रधान असा पंतप्रधानासाठी इंडिया आघाडीचा नवा फॉर्म्युला आहे. ठरला असल्याची टीका देखिल त्यांनी यावेळी केली.विरोधकांनी राम मंदिराचं निमंत्रण स्विकारलं नाही. कॉंग्रेसला योग्य ते उत्तर मिळालं पाहिजे.
सनातन धर्माला विरोध करणाऱ्यांचे इंडिया आघाडी स्वागत करते.नकली शिवसेना या सगळ्यांसोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहे. आज बाळासाहेब असते तर,त्यांना दु:ख झालं असते. बाबासाहेब आंबेडकरांचे अपमान करणारं हे कॉंग्रेस आहे
दलितांचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटण्याच्या प्रयत्नात आहे.
आजपर्यंत अमच्या सरकारने कोल्हापूरकरांसाठी
कोल्हापूर – वैभववाडी रेल्वेला मंजुरी दिली असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “मुद्रा योजनेअंतर्गत १० लाख ऐवजी २० लाख रुपयाचं लोन देणार. महिलांची सुरक्षा ही मोदीची गॅरंटी आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे महायुती सरकार कोल्हापूराच्या विकासासाठी काम करत आहे.” असे ते म्हणाले.