Getting your Trinity Audio player ready...
|
विशेष प्रतिनिधी : कुणाल काटे
26 पक्षांची खिचडी इंडिया आघाडीच्या नावाने तयार झाली आहे. पण यांचा उमेदवार कोण? हेच अजून ठरलं नाही. देशाचं नेतृत्व ठरवण्याची ही निवडणूक आहे. रक्ताचा कण, जिवणाचा क्षण देशासाठी देणाऱ्या मोदींच्या हाथी हा देश पुन्हा एकदा द्यायचा आहे. असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते इस्लामपूर येथे बोलत होते. धैर्यशील माने याच्या प्रचारार्थ इस्लामपूर येथील गांधी चौकात जंगी जाहीर सभा संपन्न झाली. ते पुढे म्हणाले, समाजातील प्रत्येक घटकासाठी मोदींनी काम केलंय. आज जगातील शंभर देशाचे नेतृत्व मा. नरेंद्र मोदी करत आहेत. आपला भारत देश सुरक्षित करायचा असेल तर मोदीच पंतप्रधान होणे गरजेचे आहे, त्यासाठी धैर्यशील माने यांना प्रचंड मतांनी निवडून संसदेत पाठवूया असे मत व्यक्त केले.
स्वतःला शेतकरी नेते म्हणून घेताय व ऊस आंदोलनात जे दोन तरुण शहीद झाले, ज्यांच्यामुळे शहीद झाले त्या पवार कुटुंबीयांच्या मांडीवर जाऊन बसलात आणि तुम्ही आम्हाला तत्त्वज्ञान शिकवता का? असा सवाल करत युवा नेते सागर खोत यांनी राजू शेट्टी यांचा खरपूस समाचार घेतला.
महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त भागांमध्ये जल जीवन योजना अंतर्गत पाणी देण्याचं काम या मोदी सरकारने केलेला आहे. त्याचबरोबर देशातील सर्व घटकांना एकत्र घेऊन देश अखंड ठेवण्याचे काम मोदींनी केलेले आहे. त्यामुळे मोदींना पंतप्रधान करण्यासाठी श्रीरामाच्या खांद्यावरचा धनुष्यबाण दिल्लीला पाठवून श्री रामाचा भगवा फडकवल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी ग्वाही ही यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार संजय काका पाटील, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी कृषिमंत्री खासदार अनिल बोन्डे, माजी आमदार भगवान साळुंखे, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, डॉ. रनजीत पाटील, भीमराव आप्पा माने, गौरव नायकवडी, भाजपा जिल्हाप्रमुख निशिकांत दादा पाटील, विक्रम भाऊ पाटील, भाजपचे प्रसाद पाटील, सी बी पाटील आप्पा, पृथ्वीराज देशमुख, भीमराव सावंत, समित कदम , भाजपा तालुका प्रमुख निवास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अल्पसंख्यांक उपाध्यक्ष मन्सूर भाई, मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, रयत क्रांती चे सागर भाऊ खोत, शिवसेना तालुका प्रमुख सागर भाऊ मलगुंडे, चंद्रशेखर तांदळे, व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.