जब तक सुरज चांद रहेगा, तब तक संविधान नही बदलेगा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 8 Second

 

विशेष जिल्हा प्रतिनिधी :- कुणाल काटे

ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतोय. येथील खासदार व आमदारांचे काम बोलतय, त्यामुळे या मतदारसंघांमध्ये झालेल्या विकास कामांची पोच पावती म्हणून धैर्यशील माने ना पुन्हा निवडून द्या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते जयसिंगपूर येथील प्रचार सभेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले, शिरोळ तालुक्यात येणाऱ्या पूर परिस्थिती निवारणासाठी 3200 कोटीचा आराखडा तयार केला आहे, त्यामुळे येणारे काळात पूर बंद होईल याची खात्री दिली. त्याचबरोबर “जब तक सुरज चांद रहेगा, तब तक संविधान नही बदलेगा” असं म्हणत विरोधकांना टोला लगावला. त्याचबरोबर येणाऱ्या काळात या मतदारसंघात लागेल तेवढा विकास निधी देऊ असे आश्वासन दिले.


हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुती चे उमेदवार धैर्यशील माने यांच्या निवडणूक प्रचारार्थ जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावर जंगी सभा संपन्न झाली. याप्रसंगी शिराळा तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्याचबरोबर कोळी महासंघ कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने या निवडणुकीसाठी माने यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला.


यावेळी माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार हेमंत पाटील, डॉ. संजय पाटील, माजी खासदार निवेदिता माने वाहिनी, शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे, म न से उपप्रदेशाध्यक्ष पुंडलिक भाऊ जाधव, रजनीताई मगदूम, गुरुदत्त साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे, जि प सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर सरकार, विजयजी भोजे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सतीशजी मलमे, पी आई पी चे जयदीप कवाडे, शिरोळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील, आदित्य पाटील यड्रावकर, भाजपा तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे, युवा सेना तालुकाध्यक्ष राकेश खोंद्रे, रामभाऊ डांगे, विद्याधर कुलकर्णी, मिलिंद भिडे, आदी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *