मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क
सांगली (सांगलीवाडी) : दि 15 सध्या दहावी आणि बारावीचा निकाल लागल्याने अनेक विद्यार्थी व पालकांना पुढील अकरावी बारावी साठी ऍडमिशन घेत असताना उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी सांगलवाडी चावडी मध्ये गेले असताा तलाठ्यांच्या कडून विद्यार्थ्यांना अर्रेरावीची भाषा करत पंधरा ते वीस दिवसांनी दाखल्यासाठी येण्यास सांगितले पण विद्यार्थी यांनी तलाठ्यांना विनंती करून मला शिक्षणाच्या ऍडमिशन साठी दाखला हवे आहे आपण लक्ष घालून लवकर दिला तर बर होईल अशी विनंती केली असता त्या तलाठी चांगलाच तापून लवकर दाखला मिळणार नाही असे स्पष्ट बजावून सांगून विद्यार्थ्यांना मुखाट्याने घरी जाण्यास भाग पाडले. याला तलाठ्याचा अजब कारभारच म्हणावा लागेल,
अनेक वेळा तलाठी यांच्याकडून दाखला उतारा वगैरे हवी असल्यास अर्थपूर्ण व्यवहार झाले की ताबडतोब एका दिवसात दाखला दिला जातो. पण मात्र शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना हवी असणारे उत्पन्नाचा दाखला मात्र लवकर मिळत नाही, त्याची प्रशासनाने गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. अन्यथा सामाजिक संस्था रस्त्यावर उतरण्याचे नागरिकांच्यातून बोलण्यातात येत आहे