अजय शिंगे/कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी मंगळवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय भव्य मोर्चा काढण्यात आला. दसरा चौकातून निघालेल्या या मोर्चामध्ये शेतकऱ्यांची एकजूट दिसून अली .शहराला उद्ध्वस्त करणारा हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी भव्य असा मोर्चा हा काढण्यात आला आहे. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला.काँट्रॅक्टरांच्या हितासाठी असणारा हा महामार्ग रद्द झालाच पाहिजे यासासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. १२ जुलै पर्यंत जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर पुढील आंदोलन सरकारला परवडणार नाही असं इशारा यावेळी आमदार सतेज पाटील यांनी दिला दसरा चौक, व्हिनस कॉर्नर, बसंब बहार टॉकीज मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला..”भांडवलदार सरकार मुर्दाबाद, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा “अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग दणाणून सोडला.
या मोर्चात खासदार शाहू महाराज छत्रपती,आमदार सतेज पाटील, संभाजीराजे छत्रपती, आमदार जयश्री जाधव, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे, गिरीश फोंडे, संजय बाबा घाटगे, भारत पाटणकर, शिवसेनेचे उपनेते संजय पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे, सम्राट मोरे, यांच्यासह हजारो शेतकरी सहभागी झाले होते.