कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांपासून कोल्हापूरची शांतता बिघडावी यासाठी काही घटक खूप जास्त प्रयत्न करीत आहेत.कोल्हापुरातील वातावरण त्यांना का बिघडवायचे आहे याचा शोध पोलिस यंत्रणेने लवकर घ्यावा. अलीकडेच कणेरी मठ येथे झालेल्या संत संमेलनात विश्व हिंदु परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी ख्रिस्ती आणि मुस्लीम संस्थांना विदेशातून धर्मांतरासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असल्याचे विधान केले होते. त्या विरोधात पुरोगामी संघटनांनी जबरदस्तीने धर्मांतर होत असेल तर संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा कोल्हापूरला बदनाम करणाऱ्या परांडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती. निवडणूक संपल्यानंतर लगेचच बाहेरचे लोक कोल्हापुरात येऊन शांतता बिघडावी अशी विधान करीत आहेत. अशी विधान करण्यामागे त्यांचा नेमका हेतू काय आहे याचा देखील गांभीर्याने विचार करावा लागत आहे. अशी प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना केली आमदार सतेज पाटील यांनी केली.
कोल्हापूरची शांतता बिघडावी यासाठी काही घटकांचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु –
