कोल्हापूर : भारत सरकारकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त भारताला सन २०४७ पर्यंत “विकसित भारत” करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे, तसेच सन २०३० पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्टे सुद्धा साध्य करण्याचा मानस आहे. विकसित भारताची उद्दिष्टे साध्य करीत असताना भारतातील राज्यांना सुद्धा सन २०४७ पर्यंत पूर्णपणे विकसित होणे गरजेचे आहे. विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्याची अर्थव्यवस्था २०२८ पर्यंत एक ट्रिलियन यूएस डॉलर करणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. या अनुषंगाने विकासाचे केंद्र म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचा शाश्वत विकास व आर्थिक विकासासाठी विचारपूर्वक आणि विशिष्ट दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक आहे.
कोल्हापूर जिल्ह्यास केंद्रस्थानी ठेवून जिल्हा विकास धोरण व विशिष्ट नियोजन करण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता सामूहिक, संस्थात्मक आणि सामाजिक आर्थिक परिवर्तनाचे प्रयत्न केले पाहिजेत. याकरिता “महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन” (मित्र) संस्था, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत कोल्हापूर येथे शाश्वत विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत जिल्ह्यातील आर्थिक विकासाच्या संभाव्य क्षेत्राची क्षमता विचारात घेऊन आर्थिक विकास तसेच इतर विकासात्मक बाबी निवडक प्राधान्यकृत क्षेत्रांमध्ये (वस्तु निर्माण-फाउंड्री अँड इंजीनियरिंग, वस्त्रोद्योग, पर्यटन, माहिती व तंत्रज्ञान, पर्यटन व अन्न प्रक्रिया) कार्यरत असणारे भागधारक, तज्ञ, उद्योजक, अभ्यासक या सर्वांसोबत शासन विकासाबाबत विचारविमर्श होऊन विकासाला शाश्वत रूप देण्याकरिता या शाश्वत विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वसमावेशक धोरणात्मक विकासावरील “शाश्वत विकास परिषद” मंगळवार, २५ जून २०२४ रोजी कोल्हापूर येथे होणार आहे. २०४७ पर्यंत विकसित भारत आणि राज्याची १ ट्रिलियन युएस डॉलर्सची अर्थव्यवस्था गाठण्याचे शासनाचे ध्येय आहे. या कारणास्तव, भागीदार आणि भागधारकांनी एकत्र येऊन जिल्ह्याची शाश्वत आर्थिक वाढ साध्य करण्यासाठी एकत्र काम करणार आहेत.
ही परिषद धोरणकर्ते, सरकार यांच्यात कल्पना, व्यवसायाच्या संधी, सर्वोत्तम पद्धती आणि नाविन्यपूर्ण उपाय सामायिक करण्यासाठी एक व्यासपीठ असेल. अधिकारी, तज्ञ, उद्योगपती, गुंतवणूकदार, इतर भागधारक जे भविष्यातील संधींसह आपल्या जिल्ह्यासमोरील विविध विकासात्मक आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करू शकतात. हे नेटवर्किंग आणि भागीदारी फोर्जिंगची संधी देखील प्रदान करेल जे कोल्हापुरातील रहिवाशांच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी आणि जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी योगदान देऊ शकेल.