कागल: वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचा कागलमध्ये शेतकऱ्यांच्यावतीने सत्कार झाला. महाराष्ट्र राज्य सरकारने साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या मोटर पंपांचे वीजबील माफ केल्याबद्दल आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा केल्याबद्दल शेतकऱ्यांच्यावतीने हा सत्कार झाला. कागल शहरातील श्री.शिवाजी विकास सेवा संस्था, छत्रपती संभाजी विकास सेवा संस्था, श्री. गहिनीनाथ विकास सेवा संस्था, छत्रपती शाहू सहकारी पाणीपुरवठा संस्था या संस्थांच्या सभासद शेतकऱ्यांच्यावतीने या सत्काराचे आयोजन केले होते.
केंद्र सरकारच्या पी. एम. किसान योजनेप्रमाणेच राज्य सरकारने किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा दोन हजार रुपये सुरू केल्याबद्दल, शेतीसाठी एक रुपयात पिक विमा, अशा अनेक शेतकरी कल्याणाच्या योजना सुरू केल्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, शेतकरी हा सबंध जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी सदैव प्रयत्नशील आहे.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, श्री. शिवाजी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष तात्यासाहेब पाटील, विद्यमान अध्यक्ष राजेंद्र गोणुगुडे, छत्रपती संभाजी सेवा संस्थेचे अध्यक्ष शहानुर पखाली, छत्रपती शाहू सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव भगले, रामा गोरडे, गणपती संतमाळी, बाळगोंड मगदूम, गहिनीनाथ समूहाचे अध्यक्ष सम्राट सनगर, अख्तर जमादार, स्वप्निल शहा, आप्पासाहेब जाधव, मल्लेश स्वामी, बाळासाहेब भोसले, प्रदीप आतवाडकर, पंडित भुरले, शिवाजी गुरव, नामदार हसनसाहेब मुश्रीफ सहकारी दूध संस्थेचे अध्यक्ष मनोहर गुरव, रमेश भुरले, सतीश पसारे, महेश मगदूम, अमर सनगर, प्रदीप जाधव आदी प्रमुखांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.