प्रचंड इच्छाशक्ती,मानसिकता याच्या जोरावर कोल्हापूर ते लंडन साहसी प्रवास करणाऱ्या चार मित्रांचा प्रवास आणि अभ्यास पुढील पिढीसाठी प्रेरणादायी – अदृश्य काडसिधेश्वर स्वामीजी

0 0

Share Now

Read Time:10 Minute, 6 Second

कोल्हापूर/प्रतिनिधी : तयार असलेल्या रस्त्यावरून जाणे सोपे असते. आपल्याच घरातील दुसऱ्या खोलीत जाण्याची भीती वाटत असते,मात्र आपली वाट तयार करून आपल्या माय देशातून दुसऱ्या देशात जवळजवळ ७० दिवस आपल्या कुटुंबापासून दूर जाणे खूपच अवघड असते. यासाठी मानसिकता व प्रचंड इच्छाशक्ती आणि घरातील व्यक्तीची साथ हवी असते ती साथ कोल्हापूर येथील प्रसिद्ध व्यावसायिक उद्योगपती विख्यात गिर्यारोह आणि सुप्रसिद्ध मुसाफिर हेमंत भाई शहा बांधकाम व्यवसाय मदन भंडारी व प्रताप उर्फ बापू कोंडेकर आणि गुजरात मधील रीशी पावर सिस्टीम या कंपनीतील उच्चपदस्थ अधिकारी सुधीर बोरा यांना मिळाली आणि या चौघां मित्रांनी तब्बल १५ एप्रिल २०२४ ते २२ जून २०२४ असा ७० दिवसांचा कोल्हापूर ते लंडन या रोड ट्रीपचा आगळा आणि पहिला बहुमान मिळवला त्यांनी यात खूप खडतर प्रवास केला आणि कोल्हापूरचे नाव या २० देशात पोहोचविले असे उदगार अदृश्य काडसिधेश्वर स्वामीजी यांनी काढले. गौरव समितीच्या वतीने या चार मुसफिरांचा सत्कार स्वामीजींच्या हस्ते करण्यात आला.यावेळी अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी.शिर्के यांची उपस्थिती होती.यावेळी व्यासपीठावर कुलसचिव डॉ.व्ही.एम.शिंदे,प्रभारी कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील,उद्योजक शकर पाटील,पाटबंधारे विभागाचे निवृत्त संचालक खलील अन्सारी,उद्योजक अरुणकुमार गोयंका यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना अदृश्य काडसिधेश्वर स्वामीजी यांनी बाहेरील देशांमध्ये जाणे त्याठीकांणची भाषा बोलून लोकांना आपलेसे करणे आणि त्यांच्यात राहणे हे काम खूपच अवघड आहे यासाठी या चौघांनी खूपच मनाची तयारी केली आणि हा १९ हजार किलोमीटरचा प्रवास त्यांनी यशस्वी करून दाखवला त्या ठिकाणी च्या संस्कृतीचे, खाद्यपदार्थांचे जीवनमान जगण्याची पद्धत ‘सेव वॉटर सेव नेचर’ हा संदेश पोहोचविला. या प्रवासाअंतर्गत निसर्गाची पाहणी केली हा त्यांचा प्रवास आणि अभ्यास निश्चितच कोल्हापूरसाठी प्रेरणादायी ठरेल असे उद्गार काढले.

यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना कुलगुरू यांनी या चौघांनी वीस देशांचा प्रवास करून वेगवेगळ्या गोष्टी पाहून कोल्हापूरचे नाव मोठे केले आहे. या साहस वीरांचे कौतुक करणे तितके थोडेच आहे यासाठी जबरदस्त इच्छाशक्ती असेल तरच हे सर्व साध्य होऊ शकते या इच्छाशक्तीच्या जोरावरच या चौघांनी हा प्रवास पूर्ण करून दाखविला आहे. त्यांनी सर्वत्र पर्यावरणाचा नारा पोहोचवून जागृती निर्माण केलेली आहे. त्यांच्या या कार्याची दखल पुस्तक रूपाने सर्वांसमोर यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी आपले अनुभव कथन करताना प्रसिद्ध उद्योगपती विख्यात गिर्यारोहक आणि सुप्रसिद्ध मुसाफिर हेमंत भाई शहा, बांधकाम व्यावसायिक मदन भंडारी व प्रताप उर्फ बापू कोंडेकर आणि गुजरात मधील रीशी पावर सिस्टीम या कंपनीतील उच्च पदस्थ अधिकारी सुधीर बोरा यांनी बोलताना

आपल्याला आलेले अनुभव सांगितले.आमच्या स्वतःच्या फोर्चुनर आणि टोयोटो या दोन वाहनाने आम्ही नेपाळ उजबेकीस्थान, क्रिकीस्थान तुर्कस्तान,रशिया, जॉर्जिया, बल्गेरिया,  सर्बिया,हंगेरी,झेक रिपब्लिक,बेल्जियम,युनायटेड किंगडम,ग्रीस,लंडन असा २० देशांचा प्रवास केला असल्याचे सांगितले.लंडनच्या भूमीवर भारत देशाचा तिरंगा आम्ही ज्यावेळी फडकवला त्यावेळी आम्हाला आमच्या देशाचा अभिमान वाटला.या सर्वाच ठिकाणचा अभ्यास आणि विविध देशाची संस्कृती याची देवाण घेवाण करण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करा,पाणी वाचवा निसर्ग वाचवा असा संदेश आम्ही दिला.

अलीकडे ग्लोबल वॉर्मिगचा परिणाम होत चालला आहे.पाण्याची कमतरता,शेती करण्याची पद्धत अवगत करणे आवश्यक आहे,त्याचा मानवावर होणारा परिणाम यासाठी सर्वांनी मिळून काम करणे आवश्यक आहे हे यातून आम्हाला लक्षात आले.

या ७० दिवसांच्या प्रवासात आम्हाला त्या त्या ठिकाणचे गाईड यांनी दिशा दिली. यानुसार आम्ही सर्व देश पाहिले.या सर्वाची तयारी जाण्याआधी सहा महिने केली गेली.सर्व देशांचा अभ्यास माहिती संकलित करूनच आम्ही पुढे जाण्याचा निश्चय केला आणि हा दौरा यशस्वी केला यात आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्प केला.शिवाय प्रत्येक देशाचे नियम, त्याठीकाणची,संस्कृती,राहणीमान,लोकांचे जीवन जगण्याची पद्धती,त्याठिकाणी असणारे रस्ते,निसर्ग,प्रत्येक ठिकाणची खाद्य संस्कृती या सर्वच बाबींचा जवळून अभ्यास केला.या प्रत्येक ठिकाणी आम्ही भारतीय आहोत म्हणून स्वागत करण्यात आले.यातून खूप काही शिकता आले.या विकसित देशांचा विचार करता भारत हा वैभव संपन्न आणि निसर्ग संपन्न देश आहे याठिकाणी लोक स्वतंत्र विचाराने चालतात.मात्र त्याठिकाणी शासनाने घालून दिलेल्या नियमानेच लोकांना रहावे लागते हा फरक जाणवला असल्याचे या सर्वांनी बोलून दाखविले. आणि हा सर्व प्रवास आम्ही कुटुंबाने दिलेले पाठबळ आणि मित्र परिवार याचे सहकार्य,सर्व देशांचे गाईड यांच्यामुळे यशस्वी केऊ शकला असल्याचेही यांनी सांगितले.

“पर्यावरणाचे रक्षण करा ,पाणी वाचवा निसर्ग वाचवा” असा संदेश देण्यासाठी त्यांनी मायनस ९ डिग्री आणि प्लस ४३ डिग्री तापमानाचा सामना करत हा कठीण आणि अवघड असा कोल्हापूर ते लंडन जवळजवळ २० देशांचा ७० दिवसांचा व २९ हजार किलोमीटरचा थरारक,अनोखा असा प्रवास केला.यातून सेव्ह वॉटर सेव्ह नेचर…. या ‘कोल्हापूर ते लंडन’ जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव लंडनच्या हृदयावर कोरले.

अनेक तंत्र प्रणालीच्या माध्यमातून खर्चाचे पाणी सुद्धा पिण्या योग्य बनवता येते हा जलमंत्रदेखील या मंडळींनी प्रत्येक देशाच्या मातीत रुजवला. भारतीय संस्कृती आणि नीती मूल्ये अन्य देशात रुजविणे आणि अन्य देशातील चांगल्या गोष्टी, परराष्ट्राच्या विधायक संस्कृतीं आपल्या भारत देशात रुजविणे या देवाण-घेवाणीच्या उदात्त उद्देशाने कोल्हापूर लंडन रोड ट्रीपचे आयोजन या चौघा मित्रांनी केले होते. सत्कार कार्यक्रमप्रसंगी त्यांच्या या प्रवासाची अनिकेत कोंडेकर यांनी तयार केलेली डॉक्यूमेंट्री दाखविण्यात आली. ही डॉक्यूमेंट्री पाहून कोल्हापूरकरांनी टाळ्या वाजवून दाद दिली.त्यांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे आयोजन राजीव लिंग्रज, डॉ.संदीप पाटील, डी.सी.पाटील यांच्या सह गौरव समितीने केले होते.कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर,उद्योजक,बांधकाम व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *