कोल्हापूर/अजय शिंगे: कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या 6 दिवसांपासून सुरु असलेल्या धुवाँधार पावसाने सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पंचगंगेने धोका पातळी ओलांडली असून कोल्हापुरवर पुन्हा एकदा महापुराचे संकट आले आहे. राधानगरीचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडले जातील. त्यामूळे कोल्हापूरकर भितीच्या छायेत आहेत.सध्या जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील धरण, नद्यांमधील पाणी पातळीत वाढ होऊ लागल्याने पुराचा धोका निर्माण झाला आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात पावसाची संततदार कायम असून ८१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. आजही जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरु आहे . कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीचे पाणी नागरी वस्तीत येऊ लागले आहे. पुराचा धोका असणाऱ्या ठिकाणी लोकांना स्थलांतरित केले जात आहे. नदीची पाणी पातळी आज सकाळी 7 वाजता 43 फुटांवर गेली आहे. यामुळे नदी काठावरील गावांची धाकधूक वाढत आहे.राधानगरी धरण 99टक्के भरले असून त्यातून 1500 क्यूसेस विसर्ग सुरू आहे.
कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे. तसेच वारणा, कासारी, कडवी, कुंभी, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा अशा सर्वच धरणांमध्ये पाणीसाठा वाढत चालला आहे. इचलकरंजी येथे पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढल्याने जुना पूल वाहतुकीसाठी यापूर्वीच बंद झाला आहे.
जिल्ह्यातील कोणते बंधारे पाण्यात?
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी
ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, न्हावेली, उमगाव, कोकरे, कोवाड, माणगांव, ढोलगरवाडी व जंगमहट्टी.
वेदगंगा नदीवरील- म्हसवे, शेणगाव, गारगोटी, निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली व करडवाडी
हिरण्यकेशी नदीवरील – साळगांव, विलजी, ऐनापूर, गिजवणे, जरळी व हरळी
दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सिध्दनेर्ली, सुळकूड व बाचणी.
कडवी नदीवरील- भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगाव, सवते सावर्डे व सरुड पाटणे
वारणा नदीवरील -चिंचोली, तांदूळवाडी, कोडोली, माणगाव, खोची व शिगाव.
भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व शिरगाव.
कुंभी नदीवरील- कळे, शेनवडे, मांडुकली व वेतवडे
कासारी नदीवरील- येवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे, वालोली, बाजार भोगाव,पेंडाखळे, करंजफेण,
कुंभेवाडी, सुसकेवाडी, नवलाचीवाडी-1 व नवलाचीवाडी-2
धामणी नदीवरील- सुळे, पनोरे व आंबर्डे घटप्रभा नदीवरील- हिंडगाव, कानडे-सावर्डे, आडकुर, तारेवाडी, कानडेवाडी, बिजूर भोगोली व पिळणी.
तुळशी नदीवरील – बीड असे एकूण 81 बंधारे पाण्याखाली आहेत.