पण जर कोणी माझ्या डोक्यात गेले तर मी त्याला सोडणार नाही.”.. “जान्हवी किल्लेकरने !

बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली असून यावेळी वेगवेगळ्या स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. छोट्या पडद्यावरील खलनायकी भूमिकांमुळे प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवीने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. जान्हवीच्या येण्याने घरात रोजचा ड्रामा पाहायला मिळणार हे नक्कीच आहे.

जान्हवीने तिच्या बिग बॉसच्या प्रवासाबद्दल सांगितले की, “माझी सुरुवात फार छोट्या गोष्टीपासून झाली आहे. मी माझ्या जीवनात खूप संघर्ष केला आहे. माझ्या आयुष्यात महाराष्ट्राची खलनायिका ही एक टॅगलाईन झाली आहे. मी आता हिरोईन वगैरे काही करूच शकत नाही. आता तुम्ही मला सगळे पाहाल की जान्हवी खऱ्या आयुष्यात कशी आहे ते.”

Advertisements

जान्हवीने सांगितले की, “घरात फोन नसणार हे समजल्यावर मला थोडे आश्चर्यच वाटले. मला नाही माहिती की आता १०० दिवस घरात काय करणार. माझी काय अवस्था होणार कारण.. मी कायम फोनवर असते. आता या सगळ्यापासून एका वेगळ्याच जगात जायचे आहे जिथे वेगवेगळ्या स्वभावाची माणसे भेटणार आहेत. त्यांना कसे डील करायचे ते समजणे कठीण आहे पण प्रवास मजेदार होईल.”

जान्हवीने घरच्यांना सांगितले तेव्हा ती म्हणाली, “सगळ्यांना शॉक बसला. सगळे मला म्हणाले जमणार का तुला? पण माझे घरचे एकदम खुश आहेत, विशेषतः माझा मुलगा. माझा मुलगा मला म्हणाला जा आणि मजा कर.” जान्हवीने घरातल्या कामांबद्दल सांगितले की, “मला कोणतीच काम करायला आवडत नाही. मी माझ्या घरीही काम करत नाही, पण आता करावं लागेल. माझ्या जाण्याने गोंधळ होणार आहे, पण सगळ्यांना मनोरंजन नक्कीच करीन.”

जान्हवीने पुढे म्हणाली, “मी घरात कसलीही प्लॅनिंग करून चालले नाही कारण आपण करतो एक आणि वास्तवात होत एक म्हणून मी काही तयारी केली नाही. मी अतिशय शांत डोक्याने जात आहे. घरातल्यांसोबत मी अगदी छानपणे राहीन कारण मी खूप गुणी आहे. पण जर कोणी माझ्या डोक्यात गेले तर मी त्याला सोडणार नाही.”

 ‘बिग बॉस’मराठीचा नवा सीझन करा एन्जॉय दररोज रात्री 9 वाजता पाहा. फक्त आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *