कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांचा काही महिन्यांपूर्वी पदभार तडकाफडकी काढून घेतल्याने पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. आज पुन्हा त्यांची देवस्थान समितीच्या सचिव पदी निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांना नियुक्तीचं पत्र दिले.
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि परदेशातूनही भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरासह इतर सुमारे तीन हजार मंदिरांवर नियंत्रण- व्यवस्थापन करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती स्थापन केली आहे. यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालक मंडळ काम करत असते. नाईकवडे हे देवस्थान समितीचे अत्यंत उत्कृष्ट काम करत असल्याचं जगजाहीर आहे. देवस्थान समितीत अगोदर झालेल्या चुकीची कामे बाहेर काढायला सुरुवात केली होती यामुळे अनेकांना घाम सुटला होता चौकशीचे आदेशही निघाले होते यामुळे या सर्वातून स्वतःला वाचवण्यासाठी काही लोकांनी शिवराज नाईकवडे यांना हटवले अशी जोरदार चर्चा सुरु होती.
आज पुन्हा शिवराज नाईकवडे यांची सचिव पदी निवड करण्यात आल्याने कोल्हापूरकरांच्या हक्काचा माणूस पुन्हा आला अशी प्रतिक्रिया सोशल मीडिया मधून येत आहेत.
शिवराज नाईकवडे यांची देवस्थान समितीच्या सचिव पदी पुन्हा निवड….
