
दिल्ली विधानसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपाने निर्विवाद विजय संपादन केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि विकसित भारताची गतीमान उभारणी याबद्दल दिल्लीच्या मतदारांनी विश्वास दाखवला आहे. गेल्या १० वर्षातील आपच्या नेत्यांचा भ्रष्टाचार, एकाधिकारशाही याला कंटाळलेल्या दिल्लीकरांनी सणसणीत चपराक दिली आहे. सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास ही पंतप्रधानांची घोषणा दिल्लीतील जनतेने कृतीत आणून, भाजपला पूर्ण बहुमत दिले आहे. त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा दिसून येतो. तसेच भाजप पक्ष सर्वांगीण विकासाची द़ृष्टी घेऊन काम करत असल्याचे स्पष्ट होत आहे.

– खासदार धनंजय महाडिक.
Advertisements

__________________ जाहिरात_____________________

