Getting your Trinity Audio player ready...
|
मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात १४९.३५ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार अलमट्टी धरणातून ११७४६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.
पंचगंगा नदीवरील – इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली आहे.
नजिकच्या कोयना धरणात ५०.५५ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ८५.८२५ इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी ५५ दलघमी, वारणा ६२६.२२ दलघमी, दूधगंगा ४७१.२५ दलघमी, कासारी ४९.४९ दलघमी, कडवी ३८.७६ दलघमी, कुंभी ५०.५६ दलघमी, पाटगाव ७३.४२ दलघमी, चिकोत्रा २२.३२ दलघमी, चित्री २७.६३ दलघमी, जंगमहट्टी २३.५० दलघमी, घटप्रभा ४२.९७ दलघमी, जांबरे २३.२३ दलघमी, कोदे (ल पा) ६.०६ दलघमी असा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम १३.१ फूट, सुर्वे १४.१ फूट, रुई ४१.६ फूट, इचलकरंजी ३८ फूट, तेरवाड ३७ फूट, शिरोळ २९ फूट, नृसिंहवाडी २२ फूट, राजापूर 12 फूट तर नजीकच्या सांगली ५.९ फूट व अंकली ५.३ फूट अशी आहे.