मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जावेद देवडी) – शिवसेना भाजपा, रिपाइ, रयत क्रांती,शिवसंग्राम,रासपा युतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील संभाजीराव माने यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. या लोकसभेच्या रिंगणात धैर्यशील माने ही उतरल्याने निवडणुकीला रंग आला आहे.
यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील,परिवहन मंत्री दिवाकर रावते, सदाभाऊ खोत, अरुभाई दुधवडकर, आमदार सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, सुरेश हाळवणकर, राजेश क्षीरसागर, सत्यजित पाटील, शिवाजीराव नाईक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडीक, खासदार निवेदिता माने, शिवसेना जिल्हाप्रमुख, मुरलीधर जाधव, विजय देवणे यांसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आदी उपस्थित होते.

जनतेचं प्रत्येकाकडे लक्ष
आगामी लोकसभा निवडणुकीकडे जनतेनं काळजीपूर्वक लक्ष दिले असल्याचे समजत आहे. याअगोदर आश्वासने देणारे, चांगली वागणूक न देणारे, विकासाची कामे न करणारे यांच्याबाबत योग्य निर्णय जनता देणार आहे तेही मतदानातूनच. त्यामुळे जनताच आपला जनादेश मतदान करुन ठरविणार आहे. यावेळी कोण काय आश्वासने देतात याऐवजी कोणी किती चांगली, विकासातम्क कामे केली आहेत? याचा विचार जाताना केल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की.