Getting your Trinity Audio player ready...
|
हे पाणी आणले मी माठ भरुनी,
हे घोटभर घ्यावी पिऊनी!
……………………………
चवदार तळे विशेष, वीस मार्च.
…………………………………
बारा-तेरा वर्षापुर्वीची गोष्ट, मुंबई उच्च न्यायालयातील एक न्यायाधीश महोदय,
सध्या ते सेवानिवृत्त आहेत.
सांगलीच्या वारणा नदीच्या पैलतीरावर ती,त्यांचा एक जुना वाडा आज देखील हयातीत आहे.आजूबाजूला अनेक कुलकर्ण्यांचे फार जुने काळातले वाडे आज देखील पाहायला मिळतात त्या ठिकाणी.
महाराष्ट्रातील सध्या वादग्रस्त असलेले एक सेवानिवृत्त गुरुजी उर्फ भिडे गुरुजी यांचा भिडेवाडा देखील याच सांगलीत आहे.
पहिल्या पिढीच्या काळातील अनेक असे जुनाट,वाडे खास करून पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पहावयास मिळतात.
विशेषता राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव,
श्री सीताराम कुंटे जी,यांचे उच्च विद्याविभूषित वडील,तथा बिहार या राज्याचे सेवानिवृत्त
प्रधान सचिव,यांचा देखील कुंटे वाडा सांगलीमध्ये,होता.
कोल्हापूरला विशेष करून सरकार घराण्यातील अनेक लोकांची वाडे आहेत. यामध्ये प्रामुख्याने गायकवाड शिंदे जाधव घोरपडे निंबाळकर इत्यादी आहेत.
अशाच एका वाड्याचे वारसदार असणारे ते, न्यायाधीश महोदय,आणि आमची पत्रकारितेच्या माध्यमातून ओळख झाली होती.
ते जातीने ब्राह्मण होते,मात्र निशनात कायदेपंडित होते. त्यांना मिळालेल्या सवडीनुसार,सोयीच्या रिकामे वेळी, मी त्यांची अधून-मधून भेट घेत होतो. विविध विषयावर ती दहा ते पंधरा मिनिटे आमच्यात जोरदार चर्चा होत होत्या. आणि न राहुन मी त्यांना अचानक एक खोचक सवाल टाकला.
सर डॉक्टर आंबेडकरांनी या देशाला संविधान दिले आहे, मात्र सार्वजनिक जीवनात लोक त्यांना स्वीकारायला तयार होत नाही त्या पाठीमागे नाही नेमके काय कारण असावे.
न्यायाधीश महोदयांनी स्थिर भावाने मला
अगदी छान असे उत्तर दिले, कांबळे जी, डॉक्टर आंबेडकर हे खूप मोठं रसायन आहे. त्या रसायनाला वाचता वाचता वय निघून जाईल मात्र मन कधी थकणार नाही. जगभरातील विविध देशातील विद्यापीठांमध्ये त्यांच्यावरती, एकूणच त्यांच्या विविध पैलू वरती, अनेक विद्यार्थी संशोधन करत असतात.
डॉक्टर आंबेडकर यांच्या सार्वजनिक
जीवनावर ती, सामाजिक राजकीय तसेच त्यांचा कायद्याविषयी असलेला दांडगा अभ्यास, खूप मोठा संशोधनाचा भाग आहे. कुणी नाही स्वीकारले यापेक्षा, एक वकील म्हणून व नंतर एक न्यायाधीश म्हणून, डॉक्टर आंबेडकर यांनी या देशाला दिलेल्या राज्यघटनेच्या संविधानाने,या देशाला कायद्याचे राज्य दिले आहे. आजच्या एकविसाव्या शतकामध्ये, कायद्याचा अभ्यास करणारे, अनेक जण कायद्याची पदवीधारक,
यांना डॉक्टर आंबेडकर वाचल्याशिवाय पुढे जाता येत नाही ही बाब स्पष्ट करून त्यांनी मला सांगितले.
आणि माझी छाती 12 इंच ऐवजी 56 इंच फुगून गेली ती मोठ्या अभिमानाने.
न्यायाधीश महोदयांच्या टेबल वरती असणारा चहा,आनंदाच्या भरात, लवकर घेत त्यांचा निरोप घेतला,आणि मंत्रालयाच्या दिशेने, उच्च न्यायालयाच्या समोरून दुतर्फा, चाललेल्या वाहनांच्या गर्दीतून, पाय वाट काढत, मंत्रालयातील डीजे आय आर पी कडून आलेल्या एका प्रेस कॉन्फरन्स, ला नेहमीप्रमाणे उपस्थित राहण्यासाठी पावले झपाझप चालत होती.
पण चेहऱ्यावरती आनंद खूप मोठा ओसंडून वाहत होता, तो फक्त एवढ्यासाठीच की डॉक्टर आंबेडकर यांच्या विषयी असलेला नितांत आदर न्यायाधीश महोदयांनी आपल्या शब्दातुन व्यक्त केला होता. अर्थातच त्यांच्या बोलण्यात खरोखरच दम होता.आम्ही प्रत्येक माणसात जात शोधत बसतो,मात्र माणूस पण शोधण्याचा प्रयत्न कधी केला नाही,यामुळे अर्धवट ज्ञानाची शिदोरी घेऊन, प्रत्येक जण, विश्वाला गुरफटून जाता-जाता स्वतःलाच गुरफटत बसलेला आहे.
दलित वगळता डॉक्टर आंबेडकर यांना न मानणारा घटक कदाचित यातील एक असावा, असा आम्ही त्या वेळी एक स्वतःच्या मनाचा निष्कर्ष काढला होता. आज या प्रसंगाचे उदाहरण नमूद करत असताना, योगायोगाने, देहू नदीच्या पैलतीरावरील संगमा वरती नावेने प्रवास करून आलो. आणि नेमका आज महाड येथील चवदार तळ्याच्या, सत्याग्रहाचा विजय दिवस साजरा केला जातो. मात्र चवदार तळ्यावर इल्या घोटभर पाण्याला खूप विशेष असे महत्त्व आहे.
महाराष्ट्राच्या मराठी मुलखा मध्ये दोन जाती ना नेहमी श्रेष्ठत्व म्हणून बघितले जाते. त्यापैकी एक मराठा पाटील की, व दुसरी महार, आत्ताचे नवबौद्ध. मराठा समाजामध्ये पिढीच्या प्रति असलेली श्रीमंती, चार हाताने आल्या आल्या आ आतीथीला, देण्यासाठी सदैव रिकामा सोडलेला तो मोठ्या मनाचा दातृत्वाचा हात, तिसऱ्या पिढीपर्यंत कायम राहिलेला आहे. यापैकी श्रीमंती दातृत्व आणि समाजातील सर्व
घटक वर्ती नियंत्रण ठेवण्याची एक विशिष्ट पद्धत, मराठा समाजातील पुढारी मंडळींनी अंगीकार लेणे, मराठा समाज हा आज प्रथम क्रमांकावर ती दिसून येतो.
दुसरी जी आमच्या महार वाड्यात,महार या जातीने ओळखली जाते, ती आता नव बौद्ध म्हणून रूपांतरित केले आहे. या जातीला प्रतिष्ठा निर्माण होण्याचे प्रमुख कारण म्हणजे, या जातीतील कोट्यावधी लोकांचा तारणहार, सूर्यपुत्र महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, यांचा जन्म महार या जातीत झाल्यामुळे, या जातीचा उद्धार तर झालाच,मात्र, एकविसाव्या शतकामध्ये विकासाच्या प्रगतीची नाव, अनेक संघर्षाच्या वाटा तुडवत, पूर्वाश्रमीचा महार कथा आत्ताचा नवबौद्ध, आपली नाव किनार्याला घेऊन गेला आहे. चवदार तळ्याच्या घोटभर पाण्याची विशेष, यासाठी आहे की, स्वातंत्र्यपूर्व काळापासून, ते स्वातंत्र्याच्या काही वर्षांनंतर देखील, महाराणा सार्वजनिक पाणवठ्यावर ती प्रवेश केला जात नव्हता,
ज्या ठिकाणी घोटभर पाण्याला जर माणूस माणसाला उभा करत नसेल, तर याच्या सारखे किळसवाणी गोष्ट जगाच्या बाजारात शोधून देखील सापडणार नाही.
मात्र महामानव, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी,प्राथमिक स्वरूपाने, महाड येथील चवदार तळ्या वरती, सत्याग्रहाचे रूपाने घोटभर पाणी पिऊन, आम्ही माणूस आहोत आम्हाला ही माणसाप्रमाणे जगायचे आहे ही शिकवण घालून दिली. नंतर त्यांनी या देशाला घटना बहाल करत असताना, अस्पृश्य समाजाला कोणत्या कोणत्या गोष्टीला सामोरे जावे लागत आहे याची प्रत्यक्ष त्यांना जाणीव असल्याने, याच्या विरोधात घटनेमध्ये अधिक कठोरात कठोर कायदे निर्माण केलेले आहे. पूर्वाश्रमीचे महार तथा दलित समाजातील, सर्व घटकांना त्यांनी, घटनादत्त संरक्षण बहाल केलेले आहे. यापैकीच एक असणारा ॲट्रॉसिटी ॲक्ट तथा, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा. हा,अतिशय कठोर कायदा आहे.
खरंतर महार समाजाने पूर्वीपासून खूप मोठ्या झळा भोगलेले आहेत.
खूप दुःखाचे चटके सहन केलेले आहेत,
गाव वाड्यावरच जगताना,कुटुंब सांभाळताना, घरातल्या अठराविश्व दारिद्र्य च्या, भर पावसाळ्यात भिंतीला आलेल्या ओलाव्या याबरोबर, कर्जाचा डोलारे पासून ते मरणाच्या लाकडा पर्यंतच्या अनेक गोष्टी जशाच्या तशा तिसऱ्या पिढीपर्यंत चिकटून राहिलेले आहेत. आमच्या भाऊ कांबळे यांच्या घराच्या परस दारातील,असणाऱ्या, बरक्या फणसाच्या विस्तीर्ण झाडाखाली, जुन्या काळातील राजदूत तथा आजच्या बोलीभाषेतील बुलेट, ची गाडी घेऊन, सबंध गावभर खाजगी सावकारी चा पैसा गोळा करून हिंडून हिंडून, शेवटच्या वसुलीला भाऊ मा चे दारातल्या त्या बरक्या फणसाच्या झाडाखाली, नेहमीची विश्रांती घेत असलेले ती पांडबा सावकाराची,राजदूत बुलेट तथा मोटरसायकल विसावलेले असते.
त्याच्या दारात आलेल्या बुलेट चा ठोका
भाऊमाला ऐकायला आला की, त्याच्या काळजाचा ठोका चुकून जातो.
हळव्या मनाचा कांबळे चा भाऊ मा,
बुद्धाच्या आणि बाबासाहेबांच्या,
विचारावर ती पाऊल ठेवणारा एक सरळ
साध्या स्वभावाचा माणूस होता.
भाऊ माझं कुटुंब दांडगा असल्यामुळे कर्जाचा डोलारा, सांभाळत सांभाळत भाऊ माच, वय कधी सतरीवर गेलं ते देखील भाऊ माला समजलं नाही.आयुष्यातील अनेक चढ-उतार यातील ऊन-पाऊस खाल्लेल्या भाऊ मा चा अनुभव,पूर्वाश्रमीच्या महाराच्या वाट्याला आलेल्या संघर्षाचे प्राथमिक उदाहरण आहे.
नांदायला गेली लेक, सामंजस्य पनाच्या अभावामुळे,कायमची एकांगी पणाने आयुष्यभर माहेरला सडत बसली,
ती कायमची!
भाऊ माच,पप्या शहराच्या ओढीने मुंबईला गेला,मात्र माणसाने खचाखच भरलेल्या रेल्वेच्या डब्यातील ती गर्दी पाहून, माणसंच माणसाला तुडवत असणारी,ती विकृती पाहून, पप्या चं कासावीस झालेलं मन,रिकाम्या हाती मुंबईहून,गेल्या काही वर्षापासून परत आलेला आहे.मात्र मुंबईमधील बोलीभाषा त्याच्या नसानसात भिनलेने,आलो ना बोलू ना,
करू ना,असा नन्नाचा पाढा मिरवताना
गल्लीतून रिकाम्या हाती फिरताना दिसून येत आहे.
हाताला काम धंदा व नोकरी नसल्यामुळे,
पप्प्या ने आता तिशी पार केली आहे.
अनेक बचत गटांच्या कडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते गोळा करण्यासाठी,दर महिन्याच्या एक तारखेला न चुकता, खाजगी फायनान्स कंपनीचा साहेब भाऊमा चे दारात उभारलेला असतो.भाऊ माझ्या नावावर ती असलेली इनामी जमीन सात एकर ही,भाऊ मा चे समाजातील एका पुढारी ने काढलेल्या पाणीपुरवठा संस्थेच्या, कर्जाची थकबाकी पोटी एका श्रीमंत सावकार शेतकऱ्याने, संपूर्ण समाजाची साठ एकर जमीन, बँकेबरोबर सेटलमेंट लावून कवडीमोल दराने विकत घेऊन, ही जमीन दुसऱ्या शेतकऱ्याला, काही कोटीच्या घरात विकली, पुन्हा त्या शेतकऱ्याने तिसऱ्या पार्टीला, ती जमीन दोन पटीने विकली,
भाऊ मा सारे काही पाहत होता उघड्या डोळ्यांनी,घरातल्या दवा पाण्याच्या खर्चापायी, मालकीच्या शेतातील 2 एक रा चा तुकडा कधीच निघून गेला होता, खाजगी सावकाराच्या घशात,भाऊबंदकीचा वाटनेतून शिल्लक राहिलेला एक हिस्सा हा,ऊस व वर्षभराची पोटाची खळगी भरण्यासाठी भाताला, व किरकोळ भाजीपाला ठेवल्याने,अपेक्षेप्रमाणे तितकस उत्पन्न भाऊ मला मिळत नव्हतं,
अगोदरच शेतमालाला भाव नाही, त्यातल्या त्यात लहान शेतकरी असणाऱ्या, भाऊमा सारखेच्या शेती उत्पादकाला,
कुठून मिळणार हा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे. भाऊ मा हे प्राथमिक उदाहरण आहे,
मात्र गाव गाड्या वरती अशी अनेक भाऊ कांबळे, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत, येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जात आहेत, विविध मार्गाने कर्जापायी त्रस्त झालेले आहेत, डॉक्टर आंबेडकर प्रचंड शिकले या उदात्त हेतू पोटी त्यांनी आपल्या लेकरा बाळांना शिकवलं मात्र हाताला शिकलेल्या काम नाही, आणि काम नसल्यामुळे दाम नाही, यामुळे पूर्वाश्रमीचे महार तथा आत्ताचे श्रीमंत नवबौद्ध, हे आजच्या महाडच्या चवदार तळ्याच्या दिनाचे निमित्त, बारा इंचाची अर्धवट छाती फुगून, सर्वत्र व्हाट्सअप वरती मेसेज टाकू लागलेली आहेत. घोटभर पाण्याचा विजय दिवस म्हणून!
मात्र एकीकडे,गाव कुसा वरच्या महार वाड्यातील महाराची अनेक रखडलेले विविध प्रश्न, घोटभर पाण्यासाठी तळमळ लेला त्यांचा तो जीव,या पंचतारांकित जीवन जगणाऱ्या खोटारड्या प्रवृत्तीला, दिसून का येत नाही हा प्रश्न मनाला नकळत पणे चटका लावून जातो. ते,ही बाबासाहेबांना मानतात,मात्र श्रीमंत असून त्यांची वर्तणूक ही उच्चभ्रू वस्ती मध्ये राहणाऱ्या सवर्ण विचारांच्या माणसासारखी,पछाडलेल्या प्रवृत्तीची असते, गाव गाड्या वरच्या म्हणी सारखं, दारा मागून बुद्ध सांगण्यासारखी प्रवृत्ती, आज बारा इंचाची,अर्धवट छाती फुगून, चवदार तळ्यावर चे घोटभर पाणी पिण्याचे अभिमानाने सर्वत्र सांगत आहेत.
आमच्या इकडे गाव गाड्या वरती आणखीन एक म्हण म्हटली जात होती,
महारा चे घरात गाणे,
कुरवाडे चे घरात दाणे,
आणि बामनाच्या घरी लिहने,
यातील वस्तुस्थिती वास्तवता आणि विपर्यास्त प्रथम दर्शनी खरोखर बरोबरीचा आहे.
यातील पूर्वाश्रमीचा महार तथा आत्ताचा नवबौद्ध,यांचे मध्ये
गाणारी लेकरेबाळे उदंड झालेली आहेत.
यातील अनेक जण पंचतारांकित जीवन जगत आहेत. मात्र भाऊ कांबळे सारख्या अनेक प्राथमिक उदाहरणा ला मदत करण्यासाठी यांचे सरसावले हात कधी ही दातृत्वा चे मायेने पुढे येताना दिसून येत नाहीत.
आणि जी भीती डॉक्टर आंबेडकर यांना वाटत होती तीच नेमकी या एकविसाव्या शतकामध्ये खरी होताना दिसून येत आहे.
माझ्या समाजातील शिकलेली लोक माझ्या लोकांचा घात करतील.
भीमरायाने घालून दिलेल्या निळा झेंड्याखाली, आज ये कि ऐवजी बेकी दिसून येते.
दरवर्षी पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्री आळंबी प्रमाणे, बाबासाहेबांचा फोटो लावून अनेक हिरव्या झाडाखालच्या निळ्या चळवळी, बैठकी बसवायला जागा नाही तरी कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी,
बारा इंचाची छाती फुगवून तयार असतात.
आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, असे म्हणत.
पक्ष वाढले संघटना वाढल्या,
झेंडा नेहमी एकच राहिला मात्र चळवळी विभागल्या गेल्या, संघटनेच्या एका ऐवजी, संघटनेच्या नेतागिरी करणाऱ्या पुढारी मंडळी यांनी, बाबासाहेबांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्षाला, स्वयंघोषित पुढारी मंडळी यांनी
अ ब क ड अशी नावे देऊन,बाबासाहेबांच्या स्वप्नाचे वाटोळे करून ठेवले.
पन्नास वेळा आघाडी काढून हजार वेळा वंचितांना बरोबर घेऊन, स्वतः मात्र पंचतारांकित जीवन जगणाऱ्या वंचित नेत्यांना, हेलिकॉप्टर च्या प्रवासा सारखा गाव कुसा वरचा माहरवाडा दूध-भात तूप-रोटी नेहमी खात असल्यासारखे वाटते.
अशा अनेक विविध क्षेत्रातील वंचित आज पंचतारांकित जीवन जगत आहेत.
आणि भाऊमा कांबळे सारखी घोटभर पाण्याच्या प्रतिक्ष प्रतिक्षे पाई ताटकळत बसलेले आहेत.
पावसाळा आला की,शेना मातीने सारवलेल्या घरातील भिंतीला,चिकटून राहिलेला ओलावा यांना कधीही दिसून येत नाही.
आयुष्यभरातील रिन,फिटण्यासाठी घरादाराचा शेत शिवाराचे तुकडे कधी घांनवड पडलेली आहेत,याचे अशा वंचितानी कधी फिकीर केलेली नाही.
त्यांच्या लेकरा बाळांना नोकरीपासून, वंचित राहावं लागतंय याची देखील साधी काळजी करताना ती दिसून येत नाहीत. गावकुसाबाहेरील महार वाड्यावर च्या अनेक लेकरा बाळांची लगने वयाची चाळिशी उलटून गेली तरी झालेले नाहीत, याचीदेखील,साधी चौकशी 12 इंच छाती फूगवणाऱ्या अशा अर्धवट पंचतारांकित जीवन जगणाऱ्या निळ्या झेंड्याच्या नेता मंडळी पुढारी मंडळी यांनी केलेली नाही.
समाजा समाजामध्ये गटातटाचे तेढ निर्माण करून, आपल्याच बांधवाला आपणच पाडायची, आणि जयंती च्या वेळी मात्र सर्वांनी एकत्र यायचे, राजकारणातील हा उल्टा कार्यक्रम आज मीतीस पाटील समाजातील मराठा समाजाने,चार हात नेहमीच लांब ठेवलेला आहे.
मराठा समाजातील पूर्वाश्रमीच्या शिकलेल्या अनेक, पुढारी मंडळी यांनी, शेतकऱ्याच्या जगण्याची कोणती कोणती साधने आहेत त्याची निर्मिती, पिढीजात करून ठेवली. त्यासाठी सहकारी कायदा 1960 अमलात आणला, गावोगावी सहकाराचे ढोल वाजवले गेले.
सहकारी संस्था सहकारी दूध संस्था यांच्या माध्यमातून पैशाने दुधाची भरलेली मापे ओलांडू लागलीत.
सहकारी बँका, सहकारी साखर कारखानदारी औद्योगिक सहकारी कारखाने, यांचा व्याप हळूहळू वाढत गेल्याने,बेकारी,गरिबी, दारिद्र्य या अनेक गोष्टी हळूहळू त्यांच्यातील नष्ट होत गेल्या,आणि पुढारलेल्या मंडळींनी आपल्या तिसऱ्या पिढीला देखील स्थिर होण्यासाठी,
नीट रस्त्याची वाट दाखवून दिली ती या चांगल्या मार्गाने!
शिकून स्थिर झालेल्या अनेकांनी खरंतर मागे वळून पाहणे खूप गरजेचे आहे मात्र तसे होताना दिसून येत नाही.
ही खेदाची व चिंतेची बाब असल्याने,
गाव कुसा वरचा पूर्वाश्रमीचा महार तथा आत्ताचा रूपांतरित बौद्ध, किती जरी पुढारला आणि प्रगत शील च्या वाटेवरती गेला तरी,
खरोखरी ज्याला तहानलेल्या व्याकूळ आशेने घोटभर पाण्यासाठी, वाट पाहावी लागते, अशा, अनेकांना, आजच्या चौदार तळ्याचे दिनाच्या निमित्ताने, खरोखरीची कोरड पडलेल्या घशाला, घोटभर पाणी अशा बुद्धिप्रामाण्यवादी,बुद्धत्वाचा ठेका घेतलेल्या पंचतारांकित, नेहमीची बारा इंच अर्धवट छाती फुगवून दाखवनारे यांनी सधम्माने महाड येथील चवदार तळ्या तील घोटभर पाण्यासारखे घोटभर पाणी,
कोरड पडलेल्या घशाला
पाजावे एवढीच प्रामाणिक अपेक्षा आहे.
………………………………….
लेखक. तानाजी सखाराम कांबळे.
लेखक ग्रामीण भागातील वास्तव वादी अभ्यासक आहेत.
मुंबई येथील मंत्रालय व विधान भवन या,
राज्य सरकारच्या महत्त्वाच्या,
ठिकाणचे वृत्तसंकलन ते,
म मराठी न्युज नेटवर्क
मुख्य प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत.