Getting your Trinity Audio player ready...
|
मिडीया कंट्रोल न्यूज: भारत हा विकसनशील देश असून भारतासमोर अनेक समस्या आहे. त्यातली सर्वात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारी. देशात कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि बेरोजगारीची समस्या पुन्हा एकदा समोर आली. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (CMIE) जारी केलेल्या अहवालानुसार भारतात बेरोजगारांची संख्या डिसेंबर २०२१ पर्यंत ५.३ कोटी इतकी समोर आली आहे. उल्लेखनीय म्हणजे यात महिलांचा आकडासुध्दा मोठा आहे.
सीएमआयईच्या अहवालानुसार जे काम शोधत आहे, त्यांची संख्या सर्वाधिक आहे. जवळपास ३.५ कोटी लोक कामाच्या शोधात आहे. यामध्ये ८० लाख महिलांचा समावेश आहे आणि हे चिंताजनक बाब असल्याचे अहवालात म्हटले आहे तर ५.३ कोटी बेरोजगारीच्या आकडेवारीत महिलांचा आकडा १.७ कोटी आहे.
भारताचा बेरोजगारी दर खुप वाढला असून हे भारतासमोर आव्हान असल्याचे सीएमआयईच्या अहवालात म्हटले आहे. भारतात केवळ ३८ टक्के लोकांनाच रोजगार मिळत असल्याने देशात रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे सीएमआयई म्हटले आहे तर भारताला प्रबळ अर्थव्यवस्था बनवण्यासाठी जवळपास ६० टक्के लोकसंख्येला रोजगार उपलब्ध करून द्यावा लागणार असल्याचेही सीएमआयईने स्पष्ट केले आहे.