Getting your Trinity Audio player ready...
|
मुंबई/प्रतिनिधी : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी चा निकाल नुकताच जाहीर झाला असून राज्यात एकूण ९४.२२% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर दरवर्षी प्रमाणे कोकण विभागाने बाजी मारली कोकण विभागातून सर्वाधिक ९७.२१% विद्यार्थी आहेत तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाच्या लागला असून ९०.९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत विद्यार्थ्यांना निकाल दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे
राज्याच्या बारावीच्या बोर्डाची पत्रकार परिषदा आज ११ वाजता आयोजित करण्यात आली होती. राज्यात यंदा बारावी ची परीक्षा कशी घेणारी आणि किती विद्यार्थी परीक्षेला बसले होते तसेच सरासरी निकाल किती लागला आहे याची सविस्तर माहिती देण्यात आली. यंदा ७५% लेखी अभ्यासक्रमावर लेखी परीक्षा घेण्यात आली होती. तर किमान ४०% अभ्यासक्रमावर तोंडी परीक्षा घेण्यात आली होती. अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक परीक्षा, आणि प्रकल्प यासाठी दोन कालावधी देण्यात आले होते. तसेच ७० ते १०० गुणांच्या प्रश्नपत्रिकासाठी यंदा ३० मिनिट जादा कालावधी विद्यार्थ्यांना देण्यात आला होता तर ४० ते ६० गुणांची प्रश्नपत्रिका साठी १५ मिनिटे ज्यादा देण्यात आली होती. शाळा तिथं परीक्षा केंद्र यंदा कोरोणाच्या पार्श्वभूमिवर विद्यार्थ्यांना देण्यात आलं होतं. बारावीच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली असून ९५.३५% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर ९३.२९ मुले उत्तीर्ण झाली आहेत.
विभागनिहाय निकालाची टक्केवारी पुढीप्रमाणे
कोकण – ९७.२१
पुणे – ९३.६१
नागपूर – ९६.५२
औरंगाबाद – ९४.९७
मुंबई – ९०.९१
कोल्हापूर – ९५.०७
अमरावती – ९६.३४
नाशिक – ९५.०३
लातूर – ९५.२५