भाजप कडून देशाला हुकूमशाही कडे घेऊन जायचा प्रयत्न : पालकमंत्री सतेज पाटील

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 13 Second

विशेष वृत्त:अजय शिंगे

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१७ : केंद्रातील भाजपच्या हुकूमशाही आणि दबावतंत्रविरोधात आज कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी तर्फे कोल्हापुरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले.  

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले राहुलजी गांधी यांनी सातत्याने जनतेचे प्रश्न उपस्थित केल्यामुळे केंद्रातील भाजप सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. याचमुळे भाजप काँग्रेस पक्षाविरोधात ठोकशाही आणि दडपशाही करत आहे. 

काँग्रेस पक्षाने उदयपूरच्या शिबिरामध्ये ‘भारत जोडो’ची भूमिका घेतली होती. याची धास्ती घेऊन भाजपने ईडीच्या माध्यमातून ‘काँग्रेस तोडो’चा प्रयत्न सुरु असून हा हाणून पाडण्यासाठी देशभरातील काँग्रेसजन रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत. आपल्या भारत देशाचा ७५ वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना देशाला हुकूमशाहीकडे नेण्याचे पाप भाजप करत आहे.

तपास यंत्रणांचा गैरवापर आणि पोलिसांना पुढे करून सुरु असलेल्या या दडपशाहीला आम्ही कधीच भीक घालणार नाही. हुकूमशाही मोदी सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात आम्ही लोकशाही मार्गाने संघर्ष करत राहू.

यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार राजुबाबा आवाळे, माजी महापौर निलोफर आजरेकर, सचिन चव्हाण यांच्या सह काँग्रेस चे सर्व नेते पदाधिकारी आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *