Getting your Trinity Audio player ready...
|
मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (प्रतिनिधी) – राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात येणार्या पहिल्या ‘लोकशाही’ पुरस्कारांचे वितरण सोहळा आज, शनिवारी (दि.27) मुंबईत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत पार पडला. निवडणुका मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडल्याबद्दल कोल्हापूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना ‘लोकशाही’ पुरस्काराने सन्मानित केले. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ज. स. सहारिया यांनी मुंबईत बुधवारी या पुरस्कारांची घोषणा केली होती. आज, शनिवारी हॉटेल आयटीसी मराठा येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
यावेळी या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. सन 2016 आणि 2017 मध्ये पार पडलेल्या नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील कामगिरीबद्दल सहा गटांतून 14 पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी डॉ. अभिनव देशमुख यांनी गडचिरोली येथे बजावलेल्या कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.