Kolhapur : राज्य सरकारच्या वतीने पूरग्रस्तांना दहा ते पंधरा हजार रुपये मदत देणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 59 Second

मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (जावेद देवडी/प्रतिनिधी) – कोल्हापुरातील पूरस्थिती पाहता राज्य सरकारच्या वतीने पूरग्रस्तांना सुमारे दहा ते पंधरा हजार रुपये मदत केली जाणार आहे. तसेच ज्या ज्या ठिकाणी लोक अद्यापही महापूरात अडकले आहेत, त्यांना योग्य स्थळी स्थलांतर करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच या महापूरात मृत्युमूखी पड्लेल्याच्या नातेवाईकांना सुमारे पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत नुकतेच कोल्हापुरात दिले.

गेल्या चार-पाच दिवसापासून कोल्हापूरला महापूराने वेढले आहे. त्यामुळे अनेक जण आपला जीव वाचविण्यासाठी धडपड करत आहेत. या महापूराची गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. तसेच पत्रकार परिषद घेऊन महापूरात अडकलेल्याना सरकारद्वारे मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोल्हापुरात या महापुरात मृत्यू झालेल्याची संख्या चारवर गेली आहे. तसेच महापुरामुळे सुमारे 3813 घरे पडली असून 89 घरांचे नुकसान झाले आहे. आम्ही या भागात बोटी वाढविल्या आहेत. मात्र, बोटीची क्षमता पाहून त्यात लोकांना बसवावे. पाणी गेल्याने वीजपुरवठा बंद आहे. तसेच पाणी पुरवठाही बंद आहे. काही ठिकाणी एअर लिफ्टिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, प्रशिक्षण अभावी लोकांना याचा वापर करता येणार नाही. त्यामुळे बोटी वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

याचबरोबर, कर्नाटक मुख्यमंत्री येडीयूरप्पा यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे ते अलमट्टी धरणातून सुमारे पाच लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग करणार आहेत. त्यामुळे पूरस्थिती नियंत्रणात येईल. तसेच यानंतर औषध साठा उपलब्ध केला आहे. हिलीकॅप्टरला सांगलीत उतरण्याची परवानगी न दिल्याने सांगली दौरा रद्द करण्यात आला.

यावेळी खासदार संजय मंडलिक, अध्यक्ष योगेश जाधव, परिवहन मंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री, तथा पालकमंत्री चद्रकांत पाटील, खासदार छत्रपती संभाजीराजे, आमदार राजेश क्षीरसागर, म्हाडाचे अध्यक्ष समर्जीतसिंह घाटगे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिहाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषद सीईओ अमल मित्तल, भाजप महानगर जिल्हा आदेक्ष, राहुल चिक्कोडे, कोल्हापूर महानगर पालिका आयुक्त मल्लीनाथ कालशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *