बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांची अवैध वाहतूक व अनधिकृत कत्तल होवू नये यासाठी विशेष दक्षता घ्या : जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी…!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:5 Minute, 25 Second

विशेष वृत्त कौतुक नागवेकर : 

 सांगली/प्रतिनिधी दि. ०८ बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या जनावरांच्या अवैध वाहतुकीबाबत विशेष लक्ष द्यावे. आंतरराज्य सीमेवर चेक पोस्ट च्या ठिकाणी परिवहन विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्याही नेमणुका तात्पुरत्या स्वरुपात कराव्यात. तसेच Transport of Animals (Amendment) Rules, २००९ चे जिल्ह्यात योग्य प्रकारे पालन करावे. बकरी ईद सणाच्या अनुषंगाने कुर्बानीच्या वेळेस शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी. अधिकृत कत्तलखाना, बेडग रोड मिरज तसेच महानगरपालिकेने तात्पुरत्या कत्तलखान्यास परवानगी दिलेल्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवावा. प्राणी रक्षण कायदा, १९७६, महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) कायदा १९९५ तसेच प्राणी छळ प्रतिबंधक कायदा, १९६० अंतर्गत कत्तलखाना अधिनियम अंतर्गत असलेल्या तरतुदींचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच महानगरपालिका क्षेत्रातील संभाव्य मोठ्या जनावरांची अनधिकृत कत्तल रोखण्यासाठी पोलीस प्रशासन व महानगरपालिका प्रशासन यांचे संयुक्त फिरते पथक सुरु करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

  बकरी ईद सणाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस. ए. धकाते, महानगरपालिकेचे डॉ.सुनिल आंबोळे, पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय मिरज चे सहाय्यक आयुक्त डॉ. सदाशिव बेडक्याळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

   जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, बकरी ईद २०२२ च्या अनुषंगाने संबंधित सर्व विभागांनी प्राणी रक्षण कायदा, १९७६, महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) कायदा १९९५, प्राणी छळ प्रतिबंधक कायदा, १९६० अंतर्गत कत्तलखाना अधिनियम व Transport of Animals Rules, १९७८  तसेच Transport of Animals (Amendment) Rules,२००९ च्या तरतुदींची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या दि. ५ जुलै २०२२ रोजीच्या निकालासंदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडून कोणकोणती उपाययोजना करण्यात येणार आहे याबाबत विचारणा केली. यावर बेडग रोड, मिरज येथे अधिकृत कत्तलखाना असल्याने मोठ्या जनावरांची कत्तल तेथे करण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेतर्फे सांगण्यात आले. ज्या ठिकाणी तात्पुरता कत्तलखाना सुरु करणार आहे, त्या जागेची पुर्ण तपासणी करूनच जागेच्या ठिकाणी मुबलक पाण्याची सोय असावी, कत्तलखान्यात गोळा होणाऱ्या जनावरांच्या अवशेषांच्या योग्य विल्हेवाट व योग्य / पुरेपूर स्वच्छता करण्याबाबतची खात्री झाल्यावरच तात्पुरता कत्तलखाना सुरु करण्यास परवानगी द्यावी, असे निर्दश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी  दिले.           त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, अन्न प्रक्रिया इत्यापदींचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्याबाबतसुद्धा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तात्पुरत्या कत्तलखान्यास मान्यता दिल्यास तेथे गरजेप्रमाणे पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या सेवा सक्षम प्राधिकारी म्हणून उपलब्ध करून देण्याबाबतही  जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी  निर्देशित केले.

            जनावरांच्या कत्तलीनंतर गोळा करण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या जैविक कचऱ्याचे कंपोस्टींगचे नियोजन व्यवस्थित करण्याबाबत व मटन शॉप्स च्या परिसराची स्वच्छता करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ वाढविण्याबाबतही  जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यंत्रणांना सूचना दिल्या

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *