Getting your Trinity Audio player ready...
|
MEDIA CONTROL ONLINE
मुंबई/प्रतिनिधी : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या निर्णयांना नव्याने स्थापन झालेल्या सरकारने स्थगिती दिली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. ‘२९ तारखेला तत्कालीन सरकार अल्पमतात असताना त्यांनी घाईघाईने काही निर्णय घेतले होते. मात्र या निर्णयांबाबत पुढे जाऊन काही कायदेशीर अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून आम्ही पुन्हा याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यास सांगतला होता. आजच्या बैठकीत आम्ही औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर असं करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच उस्मानाबादचे नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई येथील विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे,’ अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.