Getting your Trinity Audio player ready...
|
विशेष वृत्त अजय शिंगे
कोल्हापूर : महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना यांच्या तर्फे आज प्राधिकरण कार्यालय येथे धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण कार्यालयाला पैशाचे तोरण बांधून त्यांचा निषेध करण्यात आला. यावेळी मनवासे चे जिल्हा अध्यक्ष राजू जाधव यांनी अधिकाऱ्यांचा काळाबाजार मीडिया सामोर बाहेर काढला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की गेली १७ वर्षे किणी टोल नाका हा ठेकेदारांच्या ताब्यात आहे. या ठेकेदारांनी शासनाचे नियम मोडून काही शासकीय अधिकाऱ्यांना व काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून मुदत संपली तरी जनतेला लुटायचे काम सुरू आहे. कोणी विरोध केला तर ठेकेदार पोलिसांची आणि अधिकाऱ्यांची भीती दाखवतात. हे अधिकारी विकले गेले आहेत. प्रत्येक महिन्याला यांना पाकिटातून प्रसाद मिळतो. त्यामुळे किणी टोल नाक्यावर आज देखील बेकायदेशीररित्या जबरदस्तीने वसुली केली जात आहे. मनसे वाहतूक सेनेने एक महिन्यापासून या विषयावर केंद्रीय राज्य महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना किणी टोल नक्यावर बोलवून वसुलीचा प्रकार दाखवून दिला. आणि टोल नाका ताबडतोप बंद करण्यास सांगितले तसे निवेदने हि देण्यात आले होते. आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून कोल्हापुरच्या जिल्हाधिकारी यांना देखील निवेदन देण्यात आले होते.तरीही या केंद्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण लालची अधिकाऱ्यांना जाग येत नाही आहे. आज यांच्या कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी करत अनोख्या पद्धतीने हातात पैशाची खोकी घेऊन वाजत गाजत मोर्चा काढण्यात आला.
यावेळ राजू जाधव,नागेश चौगुले, गजानन जाधव, राजू दिंडोर्ले,मोहन मालवणकर,प्रवीण माने वैभव हिरवे, राजू बागवान,किरण खाडे, जुबेर बागवान व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.