Getting your Trinity Audio player ready...
|
विशेष वृत्त अजय शिंगे
कोल्हापूर : कोल्हापूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित, आणि आ. सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून आज ‘भारत जोडो यात्रा’ कार्यकर्ता मेळावा दसरा चौक येथे कार्यकर्त्यांच्या तुफान प्रतिसादात आणि प्रचंड उत्साहात पार पडला. राजर्षी शाहू समाधी स्थळापासून पदयात्रेने या यात्रेची सुरवात झाली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. दिग्विजय सिंग यांचे यावेळी भाषण झाले. “भारताचे संविधान धोक्यात आहे. यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. यामध्ये जोडले गेलो तर कोणी आपल्याला दूर करू शकत नाही. देश म्हणून आपण एक आहोत. ते द्वेष पसरवत आहेत. आम्ही देश जोडत आहे. काहीही झाले तरी भारत जोडो यात्रा कोणीही रोखू शकत नाही. देशात बदलत चाललेले वातावरण निर्माण होत आहे,” असे प्रतिपादन यावेळी मा. दिग्विजय सिंग यांनी केले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, मा. आ. बाळासाहेब थोरात यांनी या यात्रेची जगभरात दखल घेतली जाईल, असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी यावेळी आ. सतेज पाटील साहेबांच्या संकल्पनेला दाद देत कौतुक केले. मोदी सरकार जनतेच्या मनात, देशात अशांतता निर्माण केले जात आहे, हे वातावरण बदलण्यासाठी आणि देश पुन्हा एकसंध ठेवण्यासाठी ही यात्रा सुरु असल्याचे ते म्हणाले.
खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेची माहिती जिल्ह्यातील प्रत्येक गावांत व्हावी. तसेच राहुल गांधी यांची ही पदयात्रा प्रत्येक गावांत दिसावी, यासाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने ‘नफरत छोडो, भारत जोडो’ अभियान सुरू करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावांत राहुल गांधी यांची यात्रा दाखवण्यासाठी १३ एलईडी व्हॅन तयार करण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील १२०० हून अधिक गावांत या व्हॅन सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रात फिरतील. यापुढील शंभर दिवस हा कार्यक्रम सुरू राहील. गावनिहाय या अभियानासाठी कार्यकर्त्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. देशात सत्तेवर असलेल्या भाजपकडून देश तोडण्याचे काम सुरू आहे, ते रोखण्यासाठी राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मिर अशी ‘भारत जोडो’ यात्रा सुरू केली आहे. १५० दिवस ही यात्रा देशातील विविध भागातून जाणार आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठीच हा मेळावा असून जिल्ह्यात ही यात्रा पाहता यावी यासाठी प्रत्येक गावांत एलईडी व्हॅनच्या माध्यमातून ती दाखवण्यात येणार आहे.
यावेळी भारत जोडो यात्रेचे मराठी गीत लॉंच करण्यात आले. या कार्यक्रमास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. दिग्विजय सिंग,
महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, मा. आ. बाळासाहेब थोरात, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार पी एन पाटील, आ. ऋतुराज पाटील, आ. जयंत असगवकर, आ. राजू बाबा आवाळे, आ. जयश्री जाधव,गोकुळ चे चेअरमन विश्वास पाटील, माजी महापौर निलोफर आजरेकर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण,
कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व तालुका अध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी युवक काँग्रेसचे मयूर पाटील, उदय पोवार, अश्विनी जाधव, ऐश्वर्या शिंगे,आसमा मूल्लानी,सुप्रिया साळोखे,पार्थ मुंडे,वैभव तहसीलदार, साहिल साठे, आदित्य आर्डे आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते