Getting your Trinity Audio player ready...
|
दिपक भगत-रायगड जिल्हा प्रतिनिधी
रायगड : मार्च रोजी रामनवमीचा औचित्य साधून आज नवी मुंबई येथे रायगड जिल्ह्यातील ६३.९००कि.मी लांबीच्या एकुण ४१६.६८ कोटी रुपयांचे तीन रस्त्यांच्या प्रकल्पाचे भुमिपुजन नितीन गडकरी(केंद्रिय रस्ते व महामार्ग मंत्री) यांच्या हस्ते पार पडल.
मुंबई-गोवा,पनवेल ते कासु रस्त्याच काॅक्रिटीकरण अतंर ४२.३०० किमी २५१.९६ कोटी,राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ डी.डी राजेवाडी फाटा ते करंधगाव काॅक्रिटिकरण तसेच दुपदरीकरण त्याची लांबी १३ किमी असुन खर्च २६.७३ कोटी,राष्ट्रीय महामार्ग ९६५ डी.डी वरंधगाव ते पुणे जिल्हा हद्द काॅक्रिटिकरण व दुपदरीकरण लांबी ८.६० किमी खर्च ३५.९९ कोटी या कामाच भुमिपुजन केंद्रिय रस्ते महामार्ग मंत्री मा.श्री.नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आल.यावेळी मुंबई -गोवा महामार्गावर बोलताना नितीन गडकरी यांनी “कोकणातील रस्त्याच्याबाबतीत खुपच अडचणी आहेत,कामाच्या बाबतीत एक पुस्तक तयार होईल,इतके विद्वान लोक कोकणात आहेत असे मिस्किलपणे म्हणाले.कारण रस्त्याचा विषय आला कि वर्षानुवर्षे प्रलंबीत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचा विषय निघतो.हा रस्ता करताना आलेले अनुभव,काम.करण्यास तयार नसलेले काॅन्ट्रॅक्टर,अर्धवट काम सोडून गेलेले काॅन्ट्रॅक्टर,जमीन संपादन करताना आलेले अनुभव यावर गडकरी मनमोकळेपणाने बोलले.आता कितीहि अडचणी येवुद्यात हा मुंबई-गोवा महामार्ग हा डिसेंबर अखेरीस पुर्णणत्वास नेण्याचा संकल्प केलाय.कारण आज रस्ते अपघातात आपल्या देशाचा पाहिल क्रमांक लागतो.दरवर्षी पाच लाख अपघात होतात त्यात दिड लाख लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडत असतात ही बाब निश्चितच दुखदायक आहे.हे टाळण्यासाठी लवकरच “अपघात निवारण समितीची” स्थापना केली असुन त्यात लोकप्रतिनिधी व इतर लोक असतील याची दर दोन महिण्यानी मिटिंग असेल.अपघातग्रस्त रस्त्याच्या ठिकाणी विषेश लक्ष देवून अपघात कमी करण्याचा संकल्प आपल्या सरकारचा आहे.
यावेळी राज्यातील पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार रामशेठ ठाकूर,आमदार रवीशेठ पाटील यांच्यासह स्थानिक आमदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.