मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क
कोल्हापूर महापालिकेच्या शहर अभियंतापदी पुन्हा नेत्रदीप सरनोबत यांची नियुक्ती करावी असे आदेशच नगरविकास विभागाने महापालिकेला दिल्या आहेत.
कोल्हापूर शहरातील विविध विकासकामे, विविध प्रकल्पांची कामे, सरकारच्या योजना व अमृत एक आणि दोन योजनेची यशस्वी अंमलबजावणी करुन प्रकल्प मार्गी लावणे आवश्यक आहे. यासाठी नेत्रदीप सरनोबत यांच्याकडे शहर अभियंतापदाचा व अमृत दोन या योजनेचा पूर्ण वेळ कार्यभार सोपविण्यात यावा. तसेच जल अभियंता पदाचा कार्यभार इतरांकडे सोपविण्याची कार्यवाही करावी.‘असे पत्र नगरविकास विभागाचे उपसचिव सुशिला पवार यांनी महापालिका आयुक्तांना पाठविले आहे.
वर्षाच्या आतच सरनोबत यांची पुन्हा शहर अभियंतापदी नियुक्ती
गेल्या वर्षी मार्च महिन्यात जल अभिअंता महणून बदली झाली होती. वर्षभरातच सरनोबत यांची पुन्हा शहर अभियंतापदी नियुक्ती करण्यात आली आहे- गेल्या वर्षभराचा कालावधी वगळता सरनोबत हे २००६ पासून शहर अभियंतापदावर कार्यरत होते.
वर्षभरानंतर पुन्हा सरनोबत यांची शहर अभियंतापदी नियुक्ती करावी असा आदेशही पवार यांच्या सहीनेच निघाला आहे.
गेल्या वर्षी खराब रस्त्यावरुन पदावरुन बाजूला केले होते. तर आता योजनांची यशस्वी अंमलबजावणीसाठी नियुक्ती करण्यासंबंधी कार्यवाही करावी असे कळविले आहे. गेल्या वर्षभराचा कालावधी वगळता सरनोबत हे २००६ पासून शहर अभियंतापदावर कार्यरत होते.
गत वर्षी त्यांच्याकडे पाणी पुरवठा विभागाचे जल अभियंतापद सोपविण्यात आले होते.
महानगरपालिकेचे शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड २०२२ जाहिर झाला होता. हा पुरस्कार नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवार दि.१२ ऑगस्ट २०२२ रोजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड आणि डॉ. भारती पोवार, माजी केंद्रीय सचिव राष्ट्रीय मानव अधिकार आयोग, श्री ज्ञानेश्वर मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा न्यू महाराष्ट्र सदन भवनात येथे घेण्यात आला होता. परंतु या कालावधीत कोल्हापूर शहरात पुरपरिस्थिती निर्माण झालेने सरनोबत यांच्यावर मोठी जबाबदारी असल्याने या कार्यक्रमास त्यांना उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे हा पुरस्कार केंद्राच्यावतीने कोल्हापूर महापालिकेच्या तत्कालीन प्रशासन कादंबरी बलकवडे यांच्या उपस्थिती देण्यात आला. शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत हे महापालिकेत ३३वर्षे सेवा बजावत आहेत. कोरोना काळात तसेच शहरात आलेल्या २०१९ आणि २०२१ च्या महापूरात त्यांनी उत्कृष्ट सेवा जबाबदारीने बजावली होती. याची दखल घेऊन संस्थेने पुरस्कारासाठी त्यांची निवड केल्याने त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे.
त्याच बरोबर कोल्हापूर युवा पत्रकार संघाच्या वतीने “कर्तव्यदक्ष अधिकारी ” म्हणून पुरस्कार 2024 देऊन सन्मानित करण्यात आला आहे.
नेत्रदीप सरनोबत यांची पुन्हा शहर अभिअंता पदी नियुक्ती झाल्याबद्दल हितचिंतक यांच्या कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.